शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

रूग्णसंख्येचा स्फोट, तरीही नागरिक बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:50 IST

दि. १ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या २ हजार ९७९ होती. दि. २१ रोजी ही संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये आता २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत.

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरात कोरोनाने थैमान घातले असून सध्या शहरातील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या ५ हजारांपर्यंत पोहोचली  आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त रूग्ण रूग्णालयात दाखल झाले आहेत. एकीकडे रूग्णसंख्येचा  स्फोट होत असताना  दुसरीकडे  मात्र प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत बहुतांश नागरिक बेफिकीर होऊन मास्कविना फिरत आहेत.

महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत.  शहरात अजूनही  समूह संसर्ग होण्यासासरखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र मागील मागील १० दिवसांपासून लक्षणीय  प्रमाणात वाढलेली रूग्णसंख्या  चिंतेचा  विषय ठरत आहे. 

दि. १ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या २ हजार ९७९ होती. दि. २१ रोजी ही संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये आता २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर मनपा प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. विनामास्क रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांना प्रत्येकी ५०० रूपये दंड आकारण्यात येत असून यातून मनपा दररोज ५० हजारापर्यंत दंड वसूल करत आहे. तरीही मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नाही, असे चित्र सध्या शहरात दिसत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा