शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

' वसूल करा अन् खिसे भरा'; महापालिकेच्या आशिर्वादाने माजी सैनिकांचे बरे चाललेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 13:12 IST

माजी सैनिकांनी इतर दंडाची रक्कमही वसूल केली तर त्यात ३० टक्के वाटा देण्याचे सरसकट धोरण मनपाने आता स्वीकारले आहे.

ठळक मुद्देमहापालिका सभेत ठराव एक, अंमलबजावणी दुसरीच विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल दंडात माजी सैनिकांना दिला ३४ लाखांचा वाटा

औरंगाबाद : महापालिकेने नियुक्त केलेल्या माजी सैनिकांनी मागील १५ महिन्यांत मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून तब्बल १ कोटी १३ लाख रुपये वसूल केले. यामध्ये माजी सैनिकांना ३० टक्के वाटा म्हणजे तब्बल ३४ लाख रुपये देण्यात आले. २०१८ मध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला तेव्हा महापालिकेने माजी सैनिकांना नियुक्त केले होते. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. टाकल्यास दंड आकारण्यात येईल. या दंडातील ३० टक्के रक्कम माजी सैनिकांना देण्याबाबत सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. माजी सैनिकांनी इतर दंडाची रक्कमही वसूल केली तर त्यात ३० टक्के वाटा देण्याचे सरसकट धोरण मनपाने आता स्वीकारले आहे.

नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर शहरात अभूतपूर्व असा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिक कंटाळून रस्त्यावर कचरा टाकत होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचे मोठ-मोठे डोंगर उभे होते. या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी युद्धपातळीवर ७० माजी सैनिकांची मनपात कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली. सर्वसाधारण सभेने या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला. ठरावानुसार कचऱ्यासाठी दंडात्मक कारवाईत जमा होणाऱ्या रक्कमेतील ३० टक्के रक्कम माजी सैनिकांना देण्याचे ठरले. कोरोना काळात व्यापारी, नागरिक, दवाखान्यांना नागरी मित्र पथकाकडून मोठ्या प्रमाणात दंड लावण्यात आला. जवळपास अडीच कोंटीहून अधिक रक्कम जमा झाली. त्यामध्ये मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून १ कोटी १३ लाख रुपये वसूल केले. यातील ३० टक्के वाटा म्हणजे ३४ लाख रुपये माजी सैनिकांना देण्यात आले. इतर वसुलीवरही भरघोस ३० टक्के वाटा देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.

नागरिक, व्यापाऱ्यांच्या प्रचंड तक्रारीनागरी मित्र पथकातील माजी सैनिक सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत वाईट शब्दात बोलतात. आरोपीसारखी वागणूक देतात. माजी सैनिकांच्या या वागणुकीमुळे अनेकदा राजकीय मंडळींनी त्यांच्यावर हल्लेही चढविले आहेत. कोरोना काळात नागरिकांच्या सोयीसाठी एका ऑप्टिकल चालकाला काही तास दुकान सुरू ठेवण्याची परवानगी दिली. नागरी मित्र पथकाने त्यालाही पाच हजारांचा दंड ठोठावला.

मालमत्ता कर, पाणीपट्टीतही वाटा द्याकोरोनामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली तळाला गेली आहे. या वसुलीसाठी प्रशासनाने माजी सैनिकांची मदत घेतली तर त्यातील ३० टक्के वाटा माजी सैनिकांना देणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित हाेत आहे. मालमत्ता करातून मनपाला दरवर्षी १२५, पाणीपट्टीत २५ कोटी रुपये मिळतात.

नियमानुसार इतर वसुलीत वाटा देता येत नाहीसर्वसाधारण सभेने तीन वर्षांपूर्वी कचरा रस्त्यावर टाकला तर माजी सैनिकांना दंडाचे अधिकार दिले होते. इतर कोणत्याही वसुलीत वाटा देण्याचा ठरावात उल्लेख नाही. प्रशासनाला कामाचे स्वरूप बदलून घ्यायचे असेल तर नवीन ठराव घ्यावा लागेल. सध्या देण्यात येत असलेला वाटा नियमबाह्य आहे.- नंदकुमार घोडेले, माजी महापौर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका