शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

' वसूल करा अन् खिसे भरा'; महापालिकेच्या आशिर्वादाने माजी सैनिकांचे बरे चाललेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 13:12 IST

माजी सैनिकांनी इतर दंडाची रक्कमही वसूल केली तर त्यात ३० टक्के वाटा देण्याचे सरसकट धोरण मनपाने आता स्वीकारले आहे.

ठळक मुद्देमहापालिका सभेत ठराव एक, अंमलबजावणी दुसरीच विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल दंडात माजी सैनिकांना दिला ३४ लाखांचा वाटा

औरंगाबाद : महापालिकेने नियुक्त केलेल्या माजी सैनिकांनी मागील १५ महिन्यांत मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून तब्बल १ कोटी १३ लाख रुपये वसूल केले. यामध्ये माजी सैनिकांना ३० टक्के वाटा म्हणजे तब्बल ३४ लाख रुपये देण्यात आले. २०१८ मध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला तेव्हा महापालिकेने माजी सैनिकांना नियुक्त केले होते. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. टाकल्यास दंड आकारण्यात येईल. या दंडातील ३० टक्के रक्कम माजी सैनिकांना देण्याबाबत सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. माजी सैनिकांनी इतर दंडाची रक्कमही वसूल केली तर त्यात ३० टक्के वाटा देण्याचे सरसकट धोरण मनपाने आता स्वीकारले आहे.

नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर शहरात अभूतपूर्व असा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नागरिक कंटाळून रस्त्यावर कचरा टाकत होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचे मोठ-मोठे डोंगर उभे होते. या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी युद्धपातळीवर ७० माजी सैनिकांची मनपात कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली. सर्वसाधारण सभेने या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला. ठरावानुसार कचऱ्यासाठी दंडात्मक कारवाईत जमा होणाऱ्या रक्कमेतील ३० टक्के रक्कम माजी सैनिकांना देण्याचे ठरले. कोरोना काळात व्यापारी, नागरिक, दवाखान्यांना नागरी मित्र पथकाकडून मोठ्या प्रमाणात दंड लावण्यात आला. जवळपास अडीच कोंटीहून अधिक रक्कम जमा झाली. त्यामध्ये मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून १ कोटी १३ लाख रुपये वसूल केले. यातील ३० टक्के वाटा म्हणजे ३४ लाख रुपये माजी सैनिकांना देण्यात आले. इतर वसुलीवरही भरघोस ३० टक्के वाटा देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.

नागरिक, व्यापाऱ्यांच्या प्रचंड तक्रारीनागरी मित्र पथकातील माजी सैनिक सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत वाईट शब्दात बोलतात. आरोपीसारखी वागणूक देतात. माजी सैनिकांच्या या वागणुकीमुळे अनेकदा राजकीय मंडळींनी त्यांच्यावर हल्लेही चढविले आहेत. कोरोना काळात नागरिकांच्या सोयीसाठी एका ऑप्टिकल चालकाला काही तास दुकान सुरू ठेवण्याची परवानगी दिली. नागरी मित्र पथकाने त्यालाही पाच हजारांचा दंड ठोठावला.

मालमत्ता कर, पाणीपट्टीतही वाटा द्याकोरोनामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली तळाला गेली आहे. या वसुलीसाठी प्रशासनाने माजी सैनिकांची मदत घेतली तर त्यातील ३० टक्के वाटा माजी सैनिकांना देणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित हाेत आहे. मालमत्ता करातून मनपाला दरवर्षी १२५, पाणीपट्टीत २५ कोटी रुपये मिळतात.

नियमानुसार इतर वसुलीत वाटा देता येत नाहीसर्वसाधारण सभेने तीन वर्षांपूर्वी कचरा रस्त्यावर टाकला तर माजी सैनिकांना दंडाचे अधिकार दिले होते. इतर कोणत्याही वसुलीत वाटा देण्याचा ठरावात उल्लेख नाही. प्रशासनाला कामाचे स्वरूप बदलून घ्यायचे असेल तर नवीन ठराव घ्यावा लागेल. सध्या देण्यात येत असलेला वाटा नियमबाह्य आहे.- नंदकुमार घोडेले, माजी महापौर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका