शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार, त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे : अमित देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:01 IST

Minister Amit Deshmukh News : छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक झाली, ही चांगली गोष्ट

ठळक मुद्देसरकारला कसलाही धोका नाही.

औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या सरकारला कसलाही धोका नाही. हे सरकार स्थिर आहे. मात्र, ज्या त्या पक्षाला आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले. महागाई विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळासह निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ते पत्रकारांशी बोलत होते.

तत्पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा, शहागंज येथून सायकल रॅली काढण्यात आली. स्वतः देशमुख पदाधिकाऱ्यांसह सायकलवर बसून या रॅलीव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तर सय्यद अक्रम व खालिद पठाण हे हातात तिरंगा ध्वज फडकवत, उंटावर बसून रॅलीत सहभागी झाले. पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी आरोप केला की, केंद्र सरकार पेट्रोल- डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करुन सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावत आहे. याबद्दलचा वाढता रोष लक्षात घेता २०२४ साली देशात काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक झाली, ही चांगली गोष्ट होय. यातून काही चांगले निष्पन्न होईल अशी अपेक्षा करु या, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी व्यक्त केली. 

या रॅलीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, आंदोलन समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, मोहित जाधव, डॉ. निलेश अंबेवाडीकर, मुजफ्फर खान पठाण, गौरव जैस्वाल यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद