शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असेल बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:44 IST

केंद्र सरकार अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे: किरेन रिजिजू

सिल्लोड: देशातील डोंगर दऱ्यात ग्रामीण भागातील वाडीवस्तीत राहणाऱ्या गोरगरीब अल्पसंख्याकांसह दुर्बल आणि गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा फायदा दिला जाईल. काँग्रेसने ६० वर्षात जनतेला गरीब केले आहे. मात्र आम्ही अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहोत. २०४७ पर्यंत देश पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत भारत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन निर्माण केले जातील, असे आश्वासन देखील मंत्री रिजिजू यांनी दिले.

सिल्लोड येथे मंगळवारी दुपारी ११ वाजता  शहरातील प्रियदर्शनी चौकात  राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलां - मुलींसाठी ३६ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सिल्लोड तालुक्यात २५ हजार कोटींची  विकास कामे सुरू आहे. सिल्लोड शहरात अल्पसंख्याक समाजाच्या  २५० मुलं व २५० मुली अशा ५०० विद्यार्थ्यांना राहण्यासाठी प्रशस्त वसतिगृह केले जाणार आहे. अल्पसंख्याक समाजातील वाडी वस्तीत पायाभूत सुविधा दिल्या जातील,अल्पसंख्याक समाजाच्या शाळांचा निधी २ लाखावरून १० लाख करण्यात आला आहे  सिल्लोड येथे उर्दू घर केले जाईल प्रशस्त वाचनालय इंटरनेट यामुळे ऑनलाइन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल व त्यांची शिक्षणात प्रगती होईल अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक बचत गटाला २ लाखांचे कर्ज दिले जाईल, अशी घोषणा यावेळी अल्पसंख्याकमंत्री  अब्दुल सत्तार यांनी केली.

यावेळी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन ताशीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर यांनी केले, देवेंद्र सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर शेवटी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, अजीजसेट बागवान, श्रीरंग पा साळवे, रउफ बागवान, देविदास लोखंडे, मारुती वराडे, मनोज झंवर,  विनोद मंडलेचा, सुदर्शन अग्रवाल, सय्यद नासेर, इम्रान ( गुड्डू ) ,नजीर अहेमद, सय्यद कैसर, आसिफ बागवान, राजू मिया देशमुख, सत्तार हुसेन, मतीन देशमुख, सलीम हुसेन, चेअरमन अब्दुल करीम, अजगर  झारेकर, अनिस पठाण हजर होते.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद