शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असेल बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:44 IST

केंद्र सरकार अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे: किरेन रिजिजू

सिल्लोड: देशातील डोंगर दऱ्यात ग्रामीण भागातील वाडीवस्तीत राहणाऱ्या गोरगरीब अल्पसंख्याकांसह दुर्बल आणि गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा फायदा दिला जाईल. काँग्रेसने ६० वर्षात जनतेला गरीब केले आहे. मात्र आम्ही अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहोत. २०४७ पर्यंत देश पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत भारत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन निर्माण केले जातील, असे आश्वासन देखील मंत्री रिजिजू यांनी दिले.

सिल्लोड येथे मंगळवारी दुपारी ११ वाजता  शहरातील प्रियदर्शनी चौकात  राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलां - मुलींसाठी ३६ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सिल्लोड तालुक्यात २५ हजार कोटींची  विकास कामे सुरू आहे. सिल्लोड शहरात अल्पसंख्याक समाजाच्या  २५० मुलं व २५० मुली अशा ५०० विद्यार्थ्यांना राहण्यासाठी प्रशस्त वसतिगृह केले जाणार आहे. अल्पसंख्याक समाजातील वाडी वस्तीत पायाभूत सुविधा दिल्या जातील,अल्पसंख्याक समाजाच्या शाळांचा निधी २ लाखावरून १० लाख करण्यात आला आहे  सिल्लोड येथे उर्दू घर केले जाईल प्रशस्त वाचनालय इंटरनेट यामुळे ऑनलाइन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल व त्यांची शिक्षणात प्रगती होईल अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक बचत गटाला २ लाखांचे कर्ज दिले जाईल, अशी घोषणा यावेळी अल्पसंख्याकमंत्री  अब्दुल सत्तार यांनी केली.

यावेळी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन ताशीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर यांनी केले, देवेंद्र सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर शेवटी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, अजीजसेट बागवान, श्रीरंग पा साळवे, रउफ बागवान, देविदास लोखंडे, मारुती वराडे, मनोज झंवर,  विनोद मंडलेचा, सुदर्शन अग्रवाल, सय्यद नासेर, इम्रान ( गुड्डू ) ,नजीर अहेमद, सय्यद कैसर, आसिफ बागवान, राजू मिया देशमुख, सत्तार हुसेन, मतीन देशमुख, सलीम हुसेन, चेअरमन अब्दुल करीम, अजगर  झारेकर, अनिस पठाण हजर होते.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद