शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

पाण्यासाठी चिमुकल्यांचीही भटकंती; जलवाहिनीच नसल्याने शंभूनगर वासीयांवर भीषण संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:31 IST

गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे

औरंगाबाद :  शंभूनगर, गारखेडा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंती करावी लागत आहे. पहाटे गादिया विहार परिसरातून पाणी वाहून आणावे लागते. 

विभागीय क्रीडा संकुलास लागून शंभूनगर ही वसाहत आहे. ही वसाहत बाराही महिने हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु उन्हाळ्यात बोअरही आटल्याने भीषण पाणी संकट ओढावले आहे. मात्र याकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातून मोठ्या व्यासाची जलवाहिनी गेली आहे. त्यातून नागरिकांना एक थेंबही पाणी देण्याचा अधिकार नसल्याचे अधिकारी सांगतात. गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करतात. 

टँकरशिवाय आम्हाला गत्यंतर नसल्याचे शांतीलाल गायकवाड यांनी सांगितले. गुंठेवारी भागात पाणी देता येत नाही, असे सतत सांगून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आमची बोळवण करीत आहेत, असा आरोप प्रेमानंद वाघ यांनी केला. ‘कर घ्या पाणी द्या’, असे मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना  बोलूनही पाणी प्रश्नाकडे सतत कानाडोळा केला जात आहे, असे उमर अहेमद म्हणाले. परिसरातील बोअरवेलने तळ गाठल्याने टँकर किंवा इतर वसाहतीत जाऊन पाणी आणावे लागते, असे रोहित प्रजापती, लड्डू दाभाडे म्हणाले. वयोवृद्धांसह मुलांना सकाळीच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे  घरातील कामे रखडतात, असे डॉ. रमेश शिंदे , जानेखा उस्मानखा पठाण, जावेद अहेमद यांनी सांगितले. 

शंभूनगरच्या लगत असलेल्या इमारत व कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जातो. परंतु कर भरूनही येथील नागरिकांना मनपा मोफत टँकर पाठवीत नसल्याचे भीमराव साळवे, शेख छोटूमिया शेख कादर यांनी सांगितले. स्वखर्चाने लोकप्रतिनिधीने जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. परंतु त्याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने खाजगी टँकरवरील पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे, असे यांनी सांगितले. 

नगरसेविका स्मिता घोगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, पाण्याची अवस्था गंभीर असून, जनतेला पाणी मिळावे म्हणून साडेअकरा लाखांची जलवाहिनीची फाईल आयुक्तांच्या टेबलवर पडून आहे. त्यावर सहीच झाली नाही. जनतेची पाण्यासाठीची भटकंती थांबविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महापौर व आयुक्तांनी वॉर्डात येऊन जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत, अशी विनंतीदेखील मी केली आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका