शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी चिमुकल्यांचीही भटकंती; जलवाहिनीच नसल्याने शंभूनगर वासीयांवर भीषण संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:31 IST

गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे

औरंगाबाद :  शंभूनगर, गारखेडा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी लहान मुलांसह भटकंती करावी लागत आहे. पहाटे गादिया विहार परिसरातून पाणी वाहून आणावे लागते. 

विभागीय क्रीडा संकुलास लागून शंभूनगर ही वसाहत आहे. ही वसाहत बाराही महिने हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु उन्हाळ्यात बोअरही आटल्याने भीषण पाणी संकट ओढावले आहे. मात्र याकडे मनपाचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातून मोठ्या व्यासाची जलवाहिनी गेली आहे. त्यातून नागरिकांना एक थेंबही पाणी देण्याचा अधिकार नसल्याचे अधिकारी सांगतात. गुंठेवारीत कर लावून घेतला. परंतु सेवा-सुविधा देण्याचा विसर मनपाला पडला आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करतात. 

टँकरशिवाय आम्हाला गत्यंतर नसल्याचे शांतीलाल गायकवाड यांनी सांगितले. गुंठेवारी भागात पाणी देता येत नाही, असे सतत सांगून अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन आमची बोळवण करीत आहेत, असा आरोप प्रेमानंद वाघ यांनी केला. ‘कर घ्या पाणी द्या’, असे मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना  बोलूनही पाणी प्रश्नाकडे सतत कानाडोळा केला जात आहे, असे उमर अहेमद म्हणाले. परिसरातील बोअरवेलने तळ गाठल्याने टँकर किंवा इतर वसाहतीत जाऊन पाणी आणावे लागते, असे रोहित प्रजापती, लड्डू दाभाडे म्हणाले. वयोवृद्धांसह मुलांना सकाळीच पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे  घरातील कामे रखडतात, असे डॉ. रमेश शिंदे , जानेखा उस्मानखा पठाण, जावेद अहेमद यांनी सांगितले. 

शंभूनगरच्या लगत असलेल्या इमारत व कॉम्प्लेक्स भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा केला जातो. परंतु कर भरूनही येथील नागरिकांना मनपा मोफत टँकर पाठवीत नसल्याचे भीमराव साळवे, शेख छोटूमिया शेख कादर यांनी सांगितले. स्वखर्चाने लोकप्रतिनिधीने जलवाहिनी टाकून देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. परंतु त्याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने खाजगी टँकरवरील पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे, असे यांनी सांगितले. 

नगरसेविका स्मिता घोगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, पाण्याची अवस्था गंभीर असून, जनतेला पाणी मिळावे म्हणून साडेअकरा लाखांची जलवाहिनीची फाईल आयुक्तांच्या टेबलवर पडून आहे. त्यावर सहीच झाली नाही. जनतेची पाण्यासाठीची भटकंती थांबविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. महापौर व आयुक्तांनी वॉर्डात येऊन जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत, अशी विनंतीदेखील मी केली आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका