शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

प्रशासनाच्या आदेशानंतरही रात्री ९ नंतर औरंगाबादकर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 17:57 IST

विविध वसाहती आणि प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल आणि दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे  या विशेष पाहणीत उघड झाले. एकीकडे दिवसेंदिवस कारोनाग्रस्तांची  वाढती संख्या प्रशासनाच्या नाकी नऊ आणत असली तरी  औरंगाबादकरांना मात्र  कोरोनाचा जणू विसरच  पडलाय की काय, असे जाणवत होते.

बापू सोळुंके

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रात्री ९ वाजेनंतर शहरातील सर्व बाजारपेठा बंद करण्याचा आदेश प्रशासनाने दिला हाेता.  यासंदर्भात 'लोकमत'ने मंगळवारी रात्री ९ वाजेनंतर केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मात्र प्रशासनाचा  आदेश धुडकावून औरंगाबादकर  रात्री १२  वाजेपर्यंत सुसाट होते, हे निदर्शनास आले. यात आणखी कहर म्हणजे अनेक ठिकाणी दुकानदार आणि ग्राहक विनामास्क फिरत होते. 

विविध वसाहती आणि प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल आणि दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे  या विशेष पाहणीत उघड झाले.  शहरातील कोरोना  ग्रस्तांची संख्या ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. यामुळे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ९ वाजेनंतर बाजारपेठा बंद ठेवाव्या आणि रात्री ९ नंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा इशारा दिला होता. मात्र  यानंरतही औरंगाबादकरांनी  ही गोष्ट किती  गांभिर्याने घेतली आहे, हे रिॲलिटी चेकमध्ये स्पष्ट झाले.

रात्री ९ नंतर शहरातील पुंडलिकनगर, देवळाई चौक, शिवाजी नगर, पीरबाजार, रेल्वेस्टेशन, भडकल गेट या परिसरातील सर्वच दकाने  सुरू होती.  बुढीलेन, चंपाचौक, रोशनगेट, एमजीएम रूग्णालय परिसरातील हॉटेल ग्राहकांनी भरलेले होते. यातील बहुतांश लोकांनी मास्क  घातलेले नव्हते.  मुकुंदवाडी परिसरातील चहाचे हॉटेल तर रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते. रात्री १०: ३० वा.  रोशनगेट परिसर एखाद्या बाजाराप्रमाणे माणसांनी  फुलून गेला होता.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले हॉटेल, दुध डेअरी, ज्यूस सेंटर सुरू होते व तेथे मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. यावरूनच एकीकडे दिवसेंदिवस कारोनाग्रस्तांची  वाढती संख्या प्रशासनाच्या नाकी नऊ आणत असली तरी  औरंगाबादकरांना मात्र  कोरोनाचा जणू विसरच  पडलाय की काय, असे जाणवत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याMarathwadaमराठवाडा