शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वाळूजमहानगर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 19:29 IST

वाळूज महानगर : सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या परिसराचा विकास खुंटला असून, वाळूजमहानगरसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठी ...

वाळूज महानगर : सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या परिसराचा विकास खुंटला असून, वाळूजमहानगरसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिक एकवटले आहे. या संदर्भात जोगेश्वरीत शुक्रवारी बैठक घेऊन कृती समिती स्थापन करुन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात वाळूजमहानगर परिसरातील जवळपास १८ गावांचा समावेश केला आहे. दोन दशकांचा कालावधी उलटूनही सिडको प्रशासनाने या परिसराचा विकास केलेला नाही. वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी अनधिकृत नागरी वसाहती उभ्या राहत आहेत.

दोन वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाने या परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाईचा बडगा उगारत ग्रामपंचायती व बिल्डरांना अतिक्रमणे हटविण्याविषयी नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कृती समिती स्थापन करुन सिडकोच्या विरोधात जनआंदोलन उभारले होते.

यामुळे सिडको प्रशासनाचे रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, घाणेगावसह ७ गावे एमआयडीसीकडे हस्तांतरीत केली. मात्र, एमआयडीसी प्रशासनाकडूनही विकासासाठी पावले उचलली जात नसल्याने नागरिकांत असंतोष आहे.

या पार्श्वभूमीवर गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी शुक्रवारी जोगेश्वरीत स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम व्यवसायिकांची बैठक घेतली. यात विविध विषयांवर चर्चा होऊन कृती समिती स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस पंचायत समिती सदस्य दीपक बडे, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश दळवी, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, अविनाश गायकवाड, सुर्यभान काजळे, सुनिल वाघमारे, हरिभाऊ काजळे, हरिदास चव्हाण, संजय दुबिले, रवी गाडेकर, पंढरीनाथ पवार, सोमनाथ हिवाळे आदींची उपस्थिती होती.

बैठकीत लवकरच शेतकरी कामगार ग्रामविकास कृती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या माध्यमातून प्राधिकरण स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदनत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले जाईल, असे सभापती ज्योती गायकवाड यांनी सांगितले. समिती स्थापन करण्यासाठी ३० नोव्हेंबरला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आहेत मागण्याबैठकीत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे, विकास कामे करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, आतापर्यंत झालेली बांधकामे नियमानुकुल करणे, या परिसरात रजिस्ट्री कार्यालय सुरु करणे, गावठाणाची हद्द वाढविणे, आठवडी बाजारासाठी एमआयडीसीकडे जागेची मागणी करणे, एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद