शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

वाळूजमहानगर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 19:29 IST

वाळूज महानगर : सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या परिसराचा विकास खुंटला असून, वाळूजमहानगरसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठी ...

वाळूज महानगर : सिडको व एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या परिसराचा विकास खुंटला असून, वाळूजमहानगरसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिक एकवटले आहे. या संदर्भात जोगेश्वरीत शुक्रवारी बैठक घेऊन कृती समिती स्थापन करुन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात वाळूजमहानगर परिसरातील जवळपास १८ गावांचा समावेश केला आहे. दोन दशकांचा कालावधी उलटूनही सिडको प्रशासनाने या परिसराचा विकास केलेला नाही. वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी अनधिकृत नागरी वसाहती उभ्या राहत आहेत.

दोन वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाने या परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाईचा बडगा उगारत ग्रामपंचायती व बिल्डरांना अतिक्रमणे हटविण्याविषयी नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कृती समिती स्थापन करुन सिडकोच्या विरोधात जनआंदोलन उभारले होते.

यामुळे सिडको प्रशासनाचे रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, घाणेगावसह ७ गावे एमआयडीसीकडे हस्तांतरीत केली. मात्र, एमआयडीसी प्रशासनाकडूनही विकासासाठी पावले उचलली जात नसल्याने नागरिकांत असंतोष आहे.

या पार्श्वभूमीवर गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड यांनी शुक्रवारी जोगेश्वरीत स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम व्यवसायिकांची बैठक घेतली. यात विविध विषयांवर चर्चा होऊन कृती समिती स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस पंचायत समिती सदस्य दीपक बडे, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश दळवी, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, अविनाश गायकवाड, सुर्यभान काजळे, सुनिल वाघमारे, हरिभाऊ काजळे, हरिदास चव्हाण, संजय दुबिले, रवी गाडेकर, पंढरीनाथ पवार, सोमनाथ हिवाळे आदींची उपस्थिती होती.

बैठकीत लवकरच शेतकरी कामगार ग्रामविकास कृती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या माध्यमातून प्राधिकरण स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदनत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले जाईल, असे सभापती ज्योती गायकवाड यांनी सांगितले. समिती स्थापन करण्यासाठी ३० नोव्हेंबरला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आहेत मागण्याबैठकीत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे, विकास कामे करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे, आतापर्यंत झालेली बांधकामे नियमानुकुल करणे, या परिसरात रजिस्ट्री कार्यालय सुरु करणे, गावठाणाची हद्द वाढविणे, आठवडी बाजारासाठी एमआयडीसीकडे जागेची मागणी करणे, एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद