शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: August 2, 2014 01:11 IST

इलियास बावाणी, माहूर शहर व परिसरातील जंगलातील अवैध गौण खनिज उत्खनन व वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने गावालगत असलेल्या टेकड्या बोडख्या झाल्या आहेत़

इलियास बावाणी, माहूरशहर व परिसरातील जंगलातील अवैध गौण खनिज उत्खनन व वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने गावालगत असलेल्या टेकड्या बोडख्या झाल्या आहेत़ अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्यास टेकड्यात पाणी मुरुन भूस्खलनासारखे प्रकार किंवा भूकंप झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे़मौल्यवान वनसंपदा याशिवाय गौण खनिज संरक्षण व अतिजळतन रोखण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा माहूरच्या वनविभागाकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे तालुक्यातील वन व गायरान जमिनीवर, टेकड्यावरील झाडे तोडून हजारो हेक्टरवर अतिक्रमण करण्यात आले़ वनजमीन व गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण अतिक्रमित जमिनीची सातबारावर नोंद करावी म्हणून हजारो अर्ज गेल्या वर्षभरात संबंधितांना देण्यात आले़ गेल्या वर्षभरात वनतस्करावर १२५ गुन्हे दाखल झाले आहेत़ २०१४ मध्ये आजपर्यंत ५५ गुन्हे दाखल करण्यात आले असून वनजमिनी गिळंकृत करणाऱ्यांवर राजकीय दबावापोटी एकही गुन्हा दाखल झाला नाही, हे विशेष़ माहूरगडावरील श्री रेणुका माता संस्थान हे अतिशय उंच टेकड्यावर आहे़ या टेकड्याला चोहुबाजूंनी असलेले जंगल आता विरळ झाले़ पायथ्याशी असलेले अतिक्रमण व रस्ताकामासाठी झालेले उत्खनन यामुळे भुसभुशीत पहाडाची नैसर्गिक पकड खिळखिळी झाल्याने रेणुकादेवी ते दत्तशिखर संस्थानकडे जाण्यासाठी रोपवे करण्यास शासनाने परवानगी नाकारली़ हीच अवस्था श्री दत्त शिखर संस्थान, अनुसया माता संस्थानचीही आहे़ देवदेवेश्वर संस्थाननी आपल्या मंदिराभोवती पटकोट बांधून घेतले आहे़ त्यापाठोपाठ श्री रेणुकादेवी संस्थान व श्री दत्तशिखर संस्थाननेही पटकोट बांधण्यास सुरुवात केली़ मंदिराचा खालचा भाग मात्र धोकादायक स्थितीत आहे़गडावर जाणाऱ्या रस्त्यावरील दक्षिणेकडील भाग माहूर शहराला जवळचा आहे़ या भागात नवी आबादी, गणेशनगर, लकडपुरा, देवदेवेश्वर मंदिर याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज मंडळ, दूरसंचार कार्यालय, जीवन प्राधिकरण कार्यालय व अनेक देवस्थाने आहेत़ तीर्थक्षेत्र प्राधिकरण विभागाने येथे रस्त्याचे काम केल्याने रस्ता व रामगड किल्ल्याच्या तटबंदीला लागून असलेला भाग उत्खनन केल्याने भुसभुशीत बनला आहे़ थोडासा पाऊस झाला की रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहे़ रस्त्यावर आलेले ढिगारे उचलून फेकण्याचे काम दररोज सुरू असते़ पावसात गडावर जाणाऱ्या वाहनावर दरडी कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावरील भागात दगडांनी रचलेली पडळ रस्त्याच्या कामामुळे खिळखिळी झाली़ अतिवृष्टी अथवा भूकंप झाल्यास येथे १०० टक्के जीवितहानी होणार आहे़ या भागात रामगड किल्ल्याला लागून असलेल्या गायरान जागेत झाडे तोडून अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे़ शहराला लागून असलेल्या प्रत्येक टेकडीवर उत्खनन करून अतिक्रमण झाल्याने व रामगढ किल्ल्यासह संपूर्ण पहाड भुसभुशीत झाल्याने भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही़ ....असे होते भूस्खलन अत्याधिक पावसाने डोंगराला भेगा पडतात़ यात पावसाचे पाणी मुरल्याने घर्षण कमी होवून डोंगराच्या कडा ढासळतात़ तसेच मातीच्या कणांची पकड सैल होते़ वृक्षतोड, खोदकाम, सपाटीकरण या प्रकारामुळे नैसर्गिक रचना बदलली गेल्याने असे प्रकार घडतात़ मौल्यवान वनसंपदा याशिवाय गौण खनीज संरक्षण व अतिजळतन रोखण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा माहूरच्या वनविभागाकडे उपलब्ध नाही़ त्यामुळे तालुक्यातील वन व गायरान जमिनीवर, टेकड्यावरील झाडे तोडून हजारो हेक्टरवर अतिक्रमण करण्यात आले़