शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पिशवीबंद दुधविक्री येणार कायद्याच्या कचाट्यात; पर्यावरण मंत्री कदम यांनी दिले संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 20:16 IST

राज्यातील सुमारे ९५ टक्के पिशवीबंद दुधाची विक्री प्लास्टीक बंदी अंतर्गत करण्यात येणा-या कायद्याच्या कचाट्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विभागीय पातळीवर प्लास्टीक बंदी धोरण या संदर्भात बैठक घेऊन मार्गदर्शन केलेदुध महासंघाशी चर्चा करून होणार निर्णय 

औरंगाबाद : राज्यातील सुमारे ९५ टक्के पिशवीबंद दुधाची विक्री प्लास्टीक बंदी अंतर्गत करण्यात येणा-या कायद्याच्या कचाट्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुध महासंघांशी चर्चा करून प्लास्टीक बॅगच्या ऐवजी दुस-या पर्यायावर चर्चा करुन त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विभागीय पातळीवर प्लास्टीक बंदी धोरण या संदर्भात बैठक घेऊन मार्गदर्शन केले. राज्यातील ही तिसरी बैठक होती. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिका-यांची उपस्थिती होती.पालकमंत्री कदम म्हणाले, २०१८ सालच्या गुढीपाडव्यापासून पर्यावरण संरक्षणांतर्गत प्लास्टिक वापरावर बंदी कायदा अंमलात येईल. देशात १७ ठिकाणी प्लास्टीक वापरावर बंदी असून सिक्कीम, हिमाचलप्रदेश,मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील प्लास्टिक बंदीनंतर पुढे आलेल्या पर्यायाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ पथक रवाना करण्यात आले आहे. पथक आठ दिवसांत अहवाल देईल. दुधबॅग, कडधान्य, बाटलीबंद पाणी, प्लास्टिक बॅगला तिथे काय पर्याय आहेत, ते अहवालानंतर समोर येईल. कायदा येण्यापूर्वी सहा महिन्यांचा कालावधी प्लास्टिकचा वापर करून उत्पादन करणा-यांना राहणार आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय, ग्रामपंचायतीपर्यंत सर्वांना या कायद्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे लागेल. बचतगटासाठी नाविन्यपुर्ण योजनेतून निधी देऊन कॅरीबॅग ऐवजी कापडीबॅग उत्पादनावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.बाटलीबंद पाणी विकणा-यांची मुजोरी चालणार नाही

सरकारी कार्यालयात बाटलीबंद पाणी बंद करण्यात येणार आहे. मंत्रालयात सर्वप्रथम प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यावर बंदी घालण्यात येईल. त्यानंतर मोठे हॉटेल्स, रेल्वेमध्ये बाटलीबंद पाणी वापरावर बंदी घालण्यात येईल. उत्पादकांना बाटलीबंद पाणी विक्री करण्याचा व रिसायकलींगचा निर्णय मान्य नसल्याचे समोर आले आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, बाटलीबंद पाणी उत्पादकांची मुजोरी चालणार नाही.

उत्पादन परवाना देतांना पुन:वापर करण्यात येईल,असे परवान्यात उल्लेख केलेला असतो. दुर्देवाने कुणीही रिसायकलींग करीत नाही. रिसायकलींगचे कारखाने त्यांनी काढावेत किंवा बॉटल धुऊन पुन्हा वापराव्यात. उघड्यावर बॉटल्स दिसणार नाहीत, याचा बॉण्ड उत्पादनकांनी पर्यावरण खात्याला लिहून द्यावा. राज्याचे हित असल्यामुळे कायदा सर्वांना मानावाच लागेल. रोजगाराचा काहीही प्रश्न येणार नाही, ९० टक्के प्लास्टिक दमण, वापी या भागातून राज्यात येते. उलट रिसायकलींगमुळे रोजगार वाढेल. असे कदम यांनी नमूद केले. 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमenvironmentपर्यावरण