शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

१२ वर्षांत संपूर्ण शिक्षणाचे होणार खाजगीकरण- एम.फुक्टो

By राम शिनगारे | Updated: October 29, 2023 18:17 IST

नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची मिळणार विषारी फळे

छत्रपती संभाजीनगर : उच्च शिक्षणात पदव्युत्तरपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे. या धोरणानुसार २०३५ पर्यंत महाविद्यालयांचे संलग्नीकरण बंद होईल. स्वतंत्र विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालये आणि क्लस्टर महाविद्यालये असे स्वरुप असणार आहे. त्यात अनुदानाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनाच उच्च शिक्षण मिळेल अशी स्थिती येत्या १२ वर्षातच येणार आहे. हीच स्थिती शालेय शिक्षणातही असेल असा दावा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघातर्फे (एम.फुक्टो) आयोजित पत्रकार परिषदेत केला. ही सर्व नविन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) विषारी फळे असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने एम. फुक्टो संघटनेसोबत एनईपीवर चर्चा करण्यासाठी पुढील महिन्यात बोलावले आहे. त्याविषयी चर्चा करण्यासाठी एम.फुक्टोचे अध्यक्ष डॉ.एस.पी. लवांदे, सरचिटणीस डॉ. प्रविण रघुवंशी, डॉ. सी. एस. सदाशिवन हे प्राध्यापकांशी शहरात आले होते. त्यावेळी गांधी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बामुक्टोचे डॉ. बाप्पा मस्के, डॉ. मारोती तेगमपूरे, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. विक्रम खिलारे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. डी. आर. देशमुख, डॉ. शफी शेख उपस्थित होते. यावेळी डॉ. लवांदे म्हणाले, एनईपीमध्ये महाविद्यालयांना स्वायत्ता घेणे, क्लस्टर महाविद्यालये बनविण्याचे धोरण आहे. शहरातील काही महाविद्यालये स्वायत्ता घेऊ शकतात. मात्र, ग्रामीण भागातील महाविद्यालये त्यातील काहीच करू शकणार नाहीत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे अशा महाविद्यालयांविषयी शासनाचे कोणतेही धोरण नाही. अनेक शिक्षण संस्थाच्या विश्वस्तांमध्ये प्रचंड वाद आहे. तेव्हा महाविद्यालयांचे क्लस्टर बनविण्यासाठी विश्वस्त एकत्र कसे येतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सरकारने नवीन धोरण लागू केले तरी पालकत्मवाची भूमिकाच पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

बालवाडीला १ लाख रुपयांचे शुल्क

बालवडीत गेलेल्या मुलासाठी एक लाख रुपयांचे शुल्क द्यावे लागत आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते देतील. पण मजुर, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांचे पैसे कोण देणार? शाळाच एवढ्या महाग झाल्यात आहेत तर उच्च शिक्षणात किती शुल्क द्यावे लागेल याकडेही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे बामुक्टो नवीन शैक्षणिक धोरणात शासनाच्या उत्तरदायित्वावर भर देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद