शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया रखडली; महाविद्यालये कधी उघडणार ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:42 IST

सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडले

ठळक मुद्देनोव्हेंबरअखेर सीईटीचा निकाल लागणार डिसेंबर महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

औरंगाबाद : यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी दोन वेळा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. तथापि, यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ मध्ये सुरू होईल, असा विश्वास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यक्त केला आहे. 

कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी साधारणपणे ऑगस्टपासून सुरू होत असते. मात्र, लॉकडाऊनमुळे ‘सीईटी’चे नियोजन रखडले. ऑक्टोबरमध्ये ‘सीईटी’ची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्या महिन्यात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे, तर मुंबई विभागात वीजपुरवठा बाधित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांच्या भवितव्याचा विचार करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अशा विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ऑनलाईन ‘सीईटी’ घेतली. या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. तो २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असा विश्वास राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी व्यक्त केला आहे. ‘सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या (राऊंड) सुरू होतील. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे सुरू होईल. यासाठी डिसेंबर महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होतील. 

सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडलेयासंदर्भात राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे यंदा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’बाबतचे नियोजन विस्कळीत झाले. ‘सीईटी’ घेण्याबाबत दोन वेळा नियोजन केले होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पहिली ‘सीईटी’ १ ते ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. मात्र, पूरपरिस्थिती, अतिवृष्टी आणि मुंबईत बाधित झालेला वीजपुरवठा यामुळे अनेक विद्यार्थी ‘सीईटी’पासून वंचित राहिले होते. तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ‘सीईटी’ घेतली. २८ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर लगेच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद