शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया रखडली; महाविद्यालये कधी उघडणार ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:42 IST

सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडले

ठळक मुद्देनोव्हेंबरअखेर सीईटीचा निकाल लागणार डिसेंबर महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

औरंगाबाद : यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी दोन वेळा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. तथापि, यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ मध्ये सुरू होईल, असा विश्वास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यक्त केला आहे. 

कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी साधारणपणे ऑगस्टपासून सुरू होत असते. मात्र, लॉकडाऊनमुळे ‘सीईटी’चे नियोजन रखडले. ऑक्टोबरमध्ये ‘सीईटी’ची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्या महिन्यात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे, तर मुंबई विभागात वीजपुरवठा बाधित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांच्या भवितव्याचा विचार करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अशा विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ऑनलाईन ‘सीईटी’ घेतली. या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. तो २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असा विश्वास राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी व्यक्त केला आहे. ‘सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या (राऊंड) सुरू होतील. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे सुरू होईल. यासाठी डिसेंबर महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होतील. 

सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडलेयासंदर्भात राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे यंदा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’बाबतचे नियोजन विस्कळीत झाले. ‘सीईटी’ घेण्याबाबत दोन वेळा नियोजन केले होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पहिली ‘सीईटी’ १ ते ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. मात्र, पूरपरिस्थिती, अतिवृष्टी आणि मुंबईत बाधित झालेला वीजपुरवठा यामुळे अनेक विद्यार्थी ‘सीईटी’पासून वंचित राहिले होते. तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ‘सीईटी’ घेतली. २८ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर लगेच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद