शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया रखडली; महाविद्यालये कधी उघडणार ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:42 IST

सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडले

ठळक मुद्देनोव्हेंबरअखेर सीईटीचा निकाल लागणार डिसेंबर महिन्यात संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.

औरंगाबाद : यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी दोन वेळा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे. तथापि, यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ मध्ये सुरू होईल, असा विश्वास राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने व्यक्त केला आहे. 

कोरोना महामारीमुळे यंदा शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी साधारणपणे ऑगस्टपासून सुरू होत असते. मात्र, लॉकडाऊनमुळे ‘सीईटी’चे नियोजन रखडले. ऑक्टोबरमध्ये ‘सीईटी’ची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्या महिन्यात काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे, तर मुंबई विभागात वीजपुरवठा बाधित झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्यांच्या भवितव्याचा विचार करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अशा विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ऑनलाईन ‘सीईटी’ घेतली. या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. तो २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केला जाईल, असा विश्वास राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी व्यक्त केला आहे. ‘सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या (राऊंड) सुरू होतील. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे सुरू होईल. यासाठी डिसेंबर महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होतील. 

सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश रखडलेयासंदर्भात राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे अधिकारी एस.के. महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे यंदा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’बाबतचे नियोजन विस्कळीत झाले. ‘सीईटी’ घेण्याबाबत दोन वेळा नियोजन केले होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पहिली ‘सीईटी’ १ ते ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. मात्र, पूरपरिस्थिती, अतिवृष्टी आणि मुंबईत बाधित झालेला वीजपुरवठा यामुळे अनेक विद्यार्थी ‘सीईटी’पासून वंचित राहिले होते. तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा ‘सीईटी’ घेतली. २८ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. त्यानंतर लगेच पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद