शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

‘समांतर’ची साडेसाती संपेना; आता मनपा आयुक्त सुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:03 AM

शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नाहीत.

ठळक मुद्देसमांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे.कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.

औरंगाबाद : शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नसल्याने सत्ताधाऱ्यांना हा विषय आता पुन्हा पुढे  ढकलण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामुळे ‘समांतर’ला शनिची वक्रदृष्टी लागली असल्याचे दिसत आहे. 

शहरातील १५ लाख नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीबाबत मागील एक महिन्यापासून महापालिकेत अक्षरश: टोलवाटोलवी सुरू आहे. कंपनीचे अधिकारी भेटायला तयार नसल्याने वारंवार हा विषय पुढे ढकलण्यात येत असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे. आयुक्त डॉ. विनायक यांनी मागील महिन्यातच समांतर जलवाहिनीसंदर्भात सर्वसाधारण सभेसमोर ठराव मांडला आहे. पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी कायगाव येथे पहिली आत्महत्या झाल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. ६ आॅगस्ट रोजीही सत्ताधाऱ्यांनी दिवसभर सर्वसाधारण सभा चालवूनही समांतरवर चर्चा केली नाही. शनी अमावास्येच्या दिवशी म्हणजेच ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शनी अमावास्या आमच्यासाठी चांगली असल्याची प्रतिक्रियाही महापौरांनी नोंदविली होती.

शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तीन दिवसांची सुटी टाकली आहे. त्यांना वैयक्तिक कारणासाठी मालेगाव, चंदीगढ येथे जायचे आहे. शनिवारी सकाळीच ते रवाना होणार आहेत. आपण सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकणार नाही, याची पूर्वसूचना महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग किंवा डी. पी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्ताधाऱ्यांना सभा चालवावी लागेल. समांतरचा मूळ ठराव आयुक्तांनी ठेवला असल्याने त्यांच्या उपस्थितीतच चर्चा व्हावी अशी नगरसेवकांची मागणी आहे. सभेत आयुक्त उपस्थित राहणार नसल्याने दुसऱ्या विषयांवरच चर्चा अपेक्षित आहे.

समांतरने वर्षभरात शहरात पाणीयेत्या वर्षभरात जायकवाडी धरणातून समांतरने शहरात पाणी आणल्या जाईल, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी येथे दिली. ‘क्रेडाई’ बांधकाम व्यावसायिकांच्या स्थानिक शाखेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  प्रारंभी, महापौर नंदकुमार घोडेले यांनी समांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना परदेशी म्हणाले की, समांतरमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. यासंदर्भात बैठकाही घेतल्या आहेत. पुढील नियोजन लक्षात घेता येत्या वर्षभरात समांतरने पाणी शहरात आणल्या जाईल, अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद