शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

अतिक्रमणांनी सुखना नदीपात्राचा गळा घोटला; अनेक वसाहती पाण्यात बुडाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:36 IST

वाळूमाफियांनंतर शेतकऱ्यांनी केली अतिक्रमणे

छत्रपती संभाजीनगर : सुखना नदीचा उगम सावंगी गावाजळील डोंगरातून होतो. अगोदर नदीपात्र वाळूमाफियांनी पोखरले. त्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी पात्रात मातीचा भराव टाकून अतिक्रमण केले. नदीचे पात्र कुठे ६५, तर कुठे १५० फूट रुंद आहे. मुळात नदीचे पात्र किमान २५० ते ३०० फूट रुंद हवे. पात्राचा अतिक्रमणांनी गळा घोटल्याने मागील पाच वर्षांमध्ये तिसऱ्यांदा पात्राच्या आसपास असलेल्या असंख्य वसाहती पाण्यात बुडाल्या.

महापालिकेने मागील पाच वर्षांत खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून दिले. सीएसआर फंडातून कोट्यवधी रुपये खर्च करून नदीपात्र स्वच्छ व सुंदर केले. याच पद्धतीने सुखना नदीचा कायापालट करण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले. मागील काही दिवसांत चिकलठाणा येथील बाजाराच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यातील गाळ काढला. सुखना पात्र मोठे केले. पात्रातील अनेक वर्षांची घाण, बाभळीची किमान २ हजार झाडे काढली. त्यामुळे गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका चिकलठाण्याच्या वरील वसाहतींना सर्वाधिक बसला. कारण सुखना पात्राची अवस्था. 

सावंगी, हर्सूल, नारेगाव, ब्रिजवाडी, सिंधीबन, चौधरी कॉलनी आदी भागांतून सुखना नदीचे पात्र जाते. या पात्रात अतिक्रमणे प्रचंड झाली. कोणी घरे बांधली, कोणी शेती करू लागले, कोणी वाळू उपसा करू लागले. पात्राची अत्यंत दयनीय अवस्था करून ठेवल्याचे सूत्रांनी नमूद केले. महापालिकेने कठोर भूमिका घेऊन पात्रातील अतिक्रमणे काढावीत. पात्र किमान २५० ते ३०० फूट रुंद करावे. तीन वर्षांपूर्वी नारेगाव भागात अतिवृष्टीनंतर अशाच पद्धतीने हाहाकार उडाला होता. नागरी वसाहती सुरक्षित ठेवायच्या असतील तर पात्राला गतवैभव मिळवून देणे गरजेचे आहे.

टॅग्स :riverनदीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर