शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अतिक्रमण हटाव विभागाचा अहवाल,‘आम्ही शहरातील केबल काढलीय...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:49 IST

एकाही खांबावरील केबल वायर मनपाने काढली नाही

ठळक मुद्देकॅनॉट भागात चित्र वेगळेच  एकाही पथदिव्यावरील केबल काढलेली नाही.

औरंगाबाद : कॅनॉट भागात विद्युत पथदिव्यांवर आजही केबलचे जाळे विखुरलेले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के केबल काढल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. या अहवालाच्या आधारे वरिष्ठांनीही खंडपीठात २०० किलोमीटर केबल काढल्याचे शपथपत्र देऊन टाकले. न्यायालयानेही २०० कि.मी. केबल आणून दाखवा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. केबल न काढताच अहवाल कोणी दिला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी विद्युत विभागाला शहरातील पथदिव्यांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका रात्रीतून तब्बल ४० हजार पथदिव्यांचे सर्वेक्षण करून अहवाल थेट आयुक्तांना सादर केला होता. हा अहवाल पाहून आयुक्तांचे डोळे पांढरे झाले होते. अलीकडेच शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे किती याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले. वॉर्डनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ हजार खड्डे असल्याचा अहवाल एका रात्रीतून दिला होता. आकड्यांचे गणित मांडण्यात अख्खी महापालिकाच पटाईत आहे. आता खंडपीठाने शहरातील पथदिव्यांवरील केबल काढण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज १५, २० किलोमीटर केबल काढण्यात आल्याचा लेखी अहवाल दिला. या अहवालाच्या आधारावर विद्युत विभागाचे प्रमुख ए.बी. देशमुख यांनी २०० कि.मी. केबल काढल्याचा दावा खंडपीठात शपथपत्राद्वारे केला. आता खंडपीठाने जप्त केलेली केबल आणून दाखवा म्हटले, तर मनपाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. 

शनिवारपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर लोबकळणाऱ्या केबल जप्त करण्याचे काम सुरू केले. कॅनॉट परिसरात तर १०० टक्के केबल काढण्यात आल्याचा दावा अतिक्रमण हटाव विभागाने केलेला आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात पाहणी केली असता कॅनॉट भागात केबलचे जाळे जशास तसे आहे. एकाही पथदिव्यावरील केबल काढलेली नाही. उलट धोकादायक पद्धतीत लोंबकळणाऱ्या केबलचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण