शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

न्यायालयाच्या आदेशानुसार जूनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: May 29, 2014 00:32 IST

विठ्ठल कटके , रेणापूर उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन ग्रामपंचायतीने १ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या ११०२ गटावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० पोलिसांची मागणी केली आहे.

विठ्ठल कटके , रेणापूर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन रेणापूर ग्रामपंचायतीने १ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या ११०२ गटावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० पोलिसांची मागणी केली आहे. शिवाय, अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांच्या उपस्थितीत तसा ठरावही पारित करण्यात आल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेला गती येणार आहे. रेणापूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी अशोक तेरकर, अनुरथ बस्तापुरे, सागर तोडकरी, मुर्गाप्पा खुमसे, प्रभाकर हलकुडे यांनी मागील तीन-साडेतीन वर्षांपासून आंदोलने केली. या संदर्भात प्रशासनाकडे निवेदने दिली. परंतु, ग्रामपंचायतीने मात्र या मागणीकडे लक्ष दिले नाही. तसेच अतिक्रमण काढण्यासंदर्भात कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. तरीही आंदोलनकर्त्यांनी मात्र लढा सुरूच ठेवला. परिणामी, अशोक तेरकर यांनी महाराष्ट्र शासनाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, रेणापूर ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी व इतरांविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात ५२५२/२०१० अन्वये जनहित याचिका दाखल केली. सदर याचिकेवरून न्यायालयात ३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुनावणी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामपंचायत मालकीच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण चार महिन्यांत काढून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश पारित करण्यात आला. या आदेशाला चार महिने पूर्ण झाल्यामुळे रेणापूर ग्रामपंचायतीने या आदेशाची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून ग्रा.पं. मालकीच्या गट नं. ११०२ मधील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. हा ठराव दादाराव कांबळे यांनी मांडला. तर कांताबाई राठोड यांनी त्याला अनुमोदन दिले. १ हेक्टर ६१ आर जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची... गट क्र. ११०२ मध्ये १ हेक्टर ६१ आर एवढी जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. या जमिनीवर ग्रामपंचायत इमारत, रेणापूर पाणीपुरवठ्याची विहीर, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, पंप हाऊस, जिल्हा बँकेची इमारत, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा आदी इमारती असून, उर्वरित जमिनीवर ७४ लोकांनी मागील काळात दुकाने थाटली होती. त्यात केवळ १८ लोकांनी डब्बे ठोकले. या १८ लोकांनाच ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटिसा दिल्या. त्यापैकी सहा जणांनी अतिक्रमणे हटविली असल्याची माहिती सरपंच हरिभाऊ साबदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. १ जून २०१४ रोजी अतिक्रमण हटविण्यासाठी रेणापूर ग्रामपंचायतीने १९ मे च्या पत्रान्वये रेणापूरच्या पोलिस निरीक्षकांकडे ५० पोलिस शिपायांची मागणी केली आहे.