शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

न्यायालयाच्या आदेशानुसार जूनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: May 29, 2014 00:32 IST

विठ्ठल कटके , रेणापूर उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन ग्रामपंचायतीने १ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या ११०२ गटावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० पोलिसांची मागणी केली आहे.

विठ्ठल कटके , रेणापूर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन रेणापूर ग्रामपंचायतीने १ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या ११०२ गटावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० पोलिसांची मागणी केली आहे. शिवाय, अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांच्या उपस्थितीत तसा ठरावही पारित करण्यात आल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेला गती येणार आहे. रेणापूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी अशोक तेरकर, अनुरथ बस्तापुरे, सागर तोडकरी, मुर्गाप्पा खुमसे, प्रभाकर हलकुडे यांनी मागील तीन-साडेतीन वर्षांपासून आंदोलने केली. या संदर्भात प्रशासनाकडे निवेदने दिली. परंतु, ग्रामपंचायतीने मात्र या मागणीकडे लक्ष दिले नाही. तसेच अतिक्रमण काढण्यासंदर्भात कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. तरीही आंदोलनकर्त्यांनी मात्र लढा सुरूच ठेवला. परिणामी, अशोक तेरकर यांनी महाराष्ट्र शासनाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, रेणापूर ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी व इतरांविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात ५२५२/२०१० अन्वये जनहित याचिका दाखल केली. सदर याचिकेवरून न्यायालयात ३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुनावणी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामपंचायत मालकीच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण चार महिन्यांत काढून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश पारित करण्यात आला. या आदेशाला चार महिने पूर्ण झाल्यामुळे रेणापूर ग्रामपंचायतीने या आदेशाची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून ग्रा.पं. मालकीच्या गट नं. ११०२ मधील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. हा ठराव दादाराव कांबळे यांनी मांडला. तर कांताबाई राठोड यांनी त्याला अनुमोदन दिले. १ हेक्टर ६१ आर जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची... गट क्र. ११०२ मध्ये १ हेक्टर ६१ आर एवढी जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. या जमिनीवर ग्रामपंचायत इमारत, रेणापूर पाणीपुरवठ्याची विहीर, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, पंप हाऊस, जिल्हा बँकेची इमारत, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा आदी इमारती असून, उर्वरित जमिनीवर ७४ लोकांनी मागील काळात दुकाने थाटली होती. त्यात केवळ १८ लोकांनी डब्बे ठोकले. या १८ लोकांनाच ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटिसा दिल्या. त्यापैकी सहा जणांनी अतिक्रमणे हटविली असल्याची माहिती सरपंच हरिभाऊ साबदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. १ जून २०१४ रोजी अतिक्रमण हटविण्यासाठी रेणापूर ग्रामपंचायतीने १९ मे च्या पत्रान्वये रेणापूरच्या पोलिस निरीक्षकांकडे ५० पोलिस शिपायांची मागणी केली आहे.