शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

औरंगाबाद मनपाच्या ३५ कोटींच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:13 IST

२०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून  ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता.

औरंगाबाद : गारखेडा भागातील लक्ष्मीनगरात महापालिकेच्या खुल्या जागेवर २०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून  ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी हा डाव उधळून लावला होता. आता २०१८ मध्ये याच जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याचे काम सुरू झाले असतानाही महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे. या भागातील सुजाण नागरिकांनी कुंभकर्णी महापालिकेला जागे करण्याचे काम सोमवारी एका निवेदनाद्वारे केले.

शिवाजीनगर रोडवर पाण्याच्या टाकीमागील गट नं. ५३ मध्ये मनपाच्या मालकीची तब्बल २ एकर जागा आहे. १९९०-९१ मध्ये महापालिकेने जलकुंभासाठी देशमुख आणि आर. पी. नाथ यांच्याकडून दोन एकर जागा घेतली होती. या जागेवर महापालिकेने पाण्याची टाकीही बांधली आहे. २०११ मध्ये मनपाच्या जागेवर चक्क प्लॉटिंग पाडण्यात आली होती.  देसरडा यांनी  प्लॉटिंग पाडल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी भूमाफियांचा डाव उधळून लावला होता.

तब्बल सात वर्षांनंतर या जागेवर डोळा असलेल्या मंडळींनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून या जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. अतिशय वेगाने हे काम सुरू आहे. या भागातील नागरिक विजय शिरसाट यांनी मनपाकडे तक्रार केली. १२ आॅक्टोबर रोजी मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पथकही तेथे पोहोचले. क्षणार्धात एका फोनवरून पथक परतले. १५ आॅक्टोबर रोजी शिरसाठ यांनी थेट महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे विविध पुराव्यंसह तक्रार दिली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार