शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कर्मचाऱ्यांचा लेखणीबंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:22 IST

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी निलंबित करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गनिहाय कर्मचारी संघटना एकवटल्या असून, आज मंगळवारी सायंकाळी कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी निलंबित करण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गनिहाय कर्मचारी संघटना एकवटल्या असून, आज मंगळवारी सायंकाळी कर्मचा-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. या कर्मचा-यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अन्यथा ६ एप्रिलपासून कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.बांधकाम विभागातील सहायक लेखाधिकारी ए.ए. खान, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए.डी. गावंडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ए.डी. साबळे, शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजीव कळम पाटील, आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी एच.एस. कोलमवाड या पाच जणांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी निलंबित केले. याव्यतिरिक्त सामान्य प्रशासन विभागातील आणखी चार कर्मचारी ‘सीईओं’च्या रडारवर आहेत. यासंबंधीची जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. काल सोमवारी सर्व कर्मचारी संघटनांनी जि.प. उद्यानात बैठक घेऊन प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला. आज मंगळवारी जि.प. मुख्यालयातील सर्व कर्मचा-यांच्या स्वाक्षरी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय व सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांना मागण्यांचे निवेदन दिले.प्रशासनाने केलेली निलंबनाची कारवाई ही अन्यायकारक आहे. महाराष्ट्र शिस्त व अपील नियमावलीनुसार निलंबनाची ही कारवाई समर्थनीय नाही. कर्मचा-यास बडतर्फ, सक्तीने सेवानिवृत्ती, सेवेतून काढून टाकण्यासारखी परिस्थिती घडल्यास संबंधित कर्मचाºयांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. निलंबित करण्यात आलेल्या पाचही कर्मचा-यांची प्रकरणे गंभीर स्वरूपाची नाहीत. त्यामुळे या कर्मचा-यांचे निलंबन समर्थनीय ठरू शकत नाही. निलंबन कारवाईच्या आदेशाने पुनर्विलोकन करण्यात यावे. ज्यामुळे कर्मचा-यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होणार नाही किंवा कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही.अन्यथा ६ एप्रिलपासून प्रशासनाविरुद्ध असहकार पुकारून लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रदीप राठोड, सुरेश गायकवाड, बाबासाहेब काळे, संजीव कळम पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद