शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

औरंगाबाद छावणीतील गॅस्ट्रोच्या साथीस परिषदेतील कर्मचारीच जबाबदार; सत्यशोधन समितीचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 19:41 IST

नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होतीपरिषदेने या घटने संदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीने छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.

औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषदेच्या कर्मचा-यांच्या चुकीमुळेच ही साथ पसरल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला आहे.   

छावणी परिषदेतील हजारो नागरिक नोव्हेंबरमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने बाधित झाले होते. यानंतर हे प्रकरण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही गाजले होते. परिषदेने या घटने संदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीमध्ये नगरसेवक किशोर कच्छवाह , एजीई कर्नल  शर्मा, आनंद शर्मा आणि परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर हे सदस्य होते. सविस्तर चौकशीअंती त्यांनी अध्यक्षांकडे अहवाल सोपविला होता. त्यावर आजच्या बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली.

याशिवाय छावणीतील ५ वार्डातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय आणि इतर प्रशासकीय निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष संजय गारोल, नामित सदस्य एजीई कर्नल शर्मा, तसेच सदस्य प्रशांत तारगे, किशोर कच्छवाह, पद्मश्री जैस्वाल, शेख हनीफ शेख इब्राहीम,मिर्जा रफतुल्ला बेग आणि प्रतिभा काकस उपस्थित होते. सीईओ नायर यांनी कार्यवाहीची नोंद घेतली. त्यांना ओएस वैशाली केनेकर यांनी सहकार्य केले.

या बाबी आहेत अहवालात घटना घडली तेंव्हा परिषदेकडे तांत्रिक कर्मचारी नव्हते. जे कर्मचारी होते, ते प्रशिक्षीत नव्हते. शिवाय कोणत्या कर्मचार्‍याचे काय कर्तव्य अथवा जबाबदारी आहे याबाबत परिषदेने कोणालाही पत्र किंवा मार्गदर्शन केले नसल्याचेही निदर्शनास आले. एखादा कर्मचारी रजेवर जाताना त्याचा कार्यभार दुसर्‍या कर्मचार्‍याला सोपवीत नाहीत. रेल्वे स्थानकाजवळील ‘स्लीव्हज व्हॉल्व’ वेळेवर दुरुस्त केला गेला नव्हता. छावणी परिषदेने महापालिकेला छावणीच्या हद्दीत नदीमध्ये मलनि:स्सारण (ड्रेनेज) वाहिन्या टाकण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. मात्र, त्यांच्या त्या कामावर देखरेख केली नाही. महापालिकेने ड्रेनेजचे घाण पाणी उघड्यावरच सोडलेले होते. तसेच साठवण टाकी (सम्प) आणि जलकुंभाची साफसफाई केली नव्हती, या व इतर बाबी बैठकीतील प्रदिर्घ चर्चेत निदर्शनास आल्या. 

कायदेशीर सल्ला घेणार परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या चुकीमुळेच गॅस्ट्रोने हजारो लोक बाधीत झाल्याचा सकृदर्शनी निष्कर्ष अहवालातून निघाला आहे. मात्र, संबंधीतांवर काय कारवाई करावी, यासंदर्भात कायदेशीर सल्ला आणि योग्य ती प्रक्रिया पुर्ण करुनच येत्या १०-१५ दिवसात ठरविले जाईल, असे अध्यक्ष ब्रिगेडियर पात्रा यांनी बैठकीत जाहीर केल्याचे उपाध्यक्ष संजय गारोल आणि इतर नगरसेवकांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यchavaniछावणीAurangabadऔरंगाबाद