शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात

By राम शिनगारे | Updated: July 13, 2023 17:05 IST

साहित्य संमेलनात घेतलेल्या ठरावांना केराची टोपली

छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मगाव असलेल्या अंबाजोगाई (जि. बीड) येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, ९ मार्च २०२३ रोजी विधानसभेतील अर्थसंकल्पात मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, (जि. अमरावती) येथे स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर विद्यापीठ स्थापनेसाठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील अंबाजोगाईऐवजी विदर्भात मराठी भाषा विद्यापीठ होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे पडसाद मराठवाड्यातील साहित्यिकांमध्ये उमटले आहेत.

मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांनी 'विवेकसिंधू’ हा पद्यग्रंथ १११० साली अंबाजोगाई येथे लिहिला. त्यांची समाधी अंबाजोगाई येथे असल्यामुळे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना अंबाजोगाईत करण्याची मागणी आहे. त्याशिवाय मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे व्हावे, असा ठराव मंजूर केला होता. त्याशिवाय अनेक अ. भा. मराठी साहित्य संमेलनांत मराठी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे करण्याचा ठराव घेतले. या सर्व बाबींना केराची टोपली दाखवत मराठीतील आद्य गद्यग्रंथ लीळाचरित्राचे लेखन ज्या ठिकाणी झाले, त्या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे करण्याची घोषणा झाली.

मराठवाड्यातील पुढाऱ्यांमुळे गेले...मराठवाड्यातील पुढाऱ्यांना कोणत्या गोष्टीचे महत्त्व वाटतच नाही. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अशोक चव्हाण यांना मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत होण्यासाठी अनेक पत्रे लिहिली. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात घेऊन गेले. त्यांच्या विरोधात कोण बोलणार? अंबाजोगाईतील अमर हबीब, दगडू लोमटे यांनी स्थानिक नगरपालिकेचा ठराव घेऊन पाठपुरावा केला. पण त्याची कोणी दखल घेतली नाही. आम्ही बोलू शकतो, मांडू शकतो. अमेरिका, दुबई, पुण्यातील साहित्य संमलेनात हा मुद्दा मांडला. अंबाजोगाईला नसेल तर पैठणला करायला पाहिजे होते. रिद्धपूर हे कोणत्याच बाबतील सोयीचे ठिकाण नाही. पण राजकीय इच्छाशक्तीच नसल्यामुळे गेले विदर्भात. त्याची कोणाला खंतही वाटणार नाही.-कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद

चर्चा मराठवाड्याची होते अन्...क्रीडा विद्यापीठ असो की आणखी विकासाच्या कोणत्या योजना. त्याची चर्चा मराठवाड्यासाठी होते पण प्रत्यक्षात अंमलबजाणी दुसरीकडेच केली जाते. अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ होण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्याऐवजी हे विद्यापीठ दुसरीकडेच होत आहे. मराठवाड्याच्या उपेक्षेत आणखी एका बाबीची भर पडली. हा कटू अनुभव कायमच मराठवाड्याच्या बाबतीतच येतो.- डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक

विदर्भात पळविलेअनेक वर्षांपासून मराठवाड्यात भाषा विद्यापीठाची मागणी होती. मात्र, नेहमीप्रमाणे मराठवाड्याच्या वाट्याचे विद्यापीठ विदर्भात पळवून नेण्यात आले. रिद्धपूर हे ठिकाण महत्त्वाचे आहेच; पण मराठी भाषेच्या विकासासाठी विद्यापीठ मराठवाड्यात स्थापन होणे गरजेचे होते.- डॉ. गणेश मोहिते, भाषा अभ्यासक

सगळ्या संस्था विदर्भात पळविल्यामराठवाड्यात होणारे आयआयएम, एम्ससह इतर महत्त्वाच्या संस्था विदर्भात पळवून नेण्यात येत आहे. त्यात आणखी भाषा विद्यापीठाची भर पडली. अनेक दशकांपासून भाषा विद्यापीठ अंबाजोगाई व्हावे, अशी मागणी आहे. त्या मागणीला आधारही आहे. तरीही हे विद्यापीठ विदर्भात पळवून नेण्यात आले. हा मराठवाड्यावर ठरवून केलेला अन्याय आहे.- डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद, शाखा अंबाजोगाई

टॅग्स :marathiमराठीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद