शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात

By राम शिनगारे | Updated: July 13, 2023 17:05 IST

साहित्य संमेलनात घेतलेल्या ठरावांना केराची टोपली

छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मगाव असलेल्या अंबाजोगाई (जि. बीड) येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, ९ मार्च २०२३ रोजी विधानसभेतील अर्थसंकल्पात मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, (जि. अमरावती) येथे स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर विद्यापीठ स्थापनेसाठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील अंबाजोगाईऐवजी विदर्भात मराठी भाषा विद्यापीठ होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे पडसाद मराठवाड्यातील साहित्यिकांमध्ये उमटले आहेत.

मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांनी 'विवेकसिंधू’ हा पद्यग्रंथ १११० साली अंबाजोगाई येथे लिहिला. त्यांची समाधी अंबाजोगाई येथे असल्यामुळे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना अंबाजोगाईत करण्याची मागणी आहे. त्याशिवाय मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे व्हावे, असा ठराव मंजूर केला होता. त्याशिवाय अनेक अ. भा. मराठी साहित्य संमेलनांत मराठी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे करण्याचा ठराव घेतले. या सर्व बाबींना केराची टोपली दाखवत मराठीतील आद्य गद्यग्रंथ लीळाचरित्राचे लेखन ज्या ठिकाणी झाले, त्या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे करण्याची घोषणा झाली.

मराठवाड्यातील पुढाऱ्यांमुळे गेले...मराठवाड्यातील पुढाऱ्यांना कोणत्या गोष्टीचे महत्त्व वाटतच नाही. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अशोक चव्हाण यांना मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत होण्यासाठी अनेक पत्रे लिहिली. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात घेऊन गेले. त्यांच्या विरोधात कोण बोलणार? अंबाजोगाईतील अमर हबीब, दगडू लोमटे यांनी स्थानिक नगरपालिकेचा ठराव घेऊन पाठपुरावा केला. पण त्याची कोणी दखल घेतली नाही. आम्ही बोलू शकतो, मांडू शकतो. अमेरिका, दुबई, पुण्यातील साहित्य संमलेनात हा मुद्दा मांडला. अंबाजोगाईला नसेल तर पैठणला करायला पाहिजे होते. रिद्धपूर हे कोणत्याच बाबतील सोयीचे ठिकाण नाही. पण राजकीय इच्छाशक्तीच नसल्यामुळे गेले विदर्भात. त्याची कोणाला खंतही वाटणार नाही.-कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद

चर्चा मराठवाड्याची होते अन्...क्रीडा विद्यापीठ असो की आणखी विकासाच्या कोणत्या योजना. त्याची चर्चा मराठवाड्यासाठी होते पण प्रत्यक्षात अंमलबजाणी दुसरीकडेच केली जाते. अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ होण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्याऐवजी हे विद्यापीठ दुसरीकडेच होत आहे. मराठवाड्याच्या उपेक्षेत आणखी एका बाबीची भर पडली. हा कटू अनुभव कायमच मराठवाड्याच्या बाबतीतच येतो.- डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक

विदर्भात पळविलेअनेक वर्षांपासून मराठवाड्यात भाषा विद्यापीठाची मागणी होती. मात्र, नेहमीप्रमाणे मराठवाड्याच्या वाट्याचे विद्यापीठ विदर्भात पळवून नेण्यात आले. रिद्धपूर हे ठिकाण महत्त्वाचे आहेच; पण मराठी भाषेच्या विकासासाठी विद्यापीठ मराठवाड्यात स्थापन होणे गरजेचे होते.- डॉ. गणेश मोहिते, भाषा अभ्यासक

सगळ्या संस्था विदर्भात पळविल्यामराठवाड्यात होणारे आयआयएम, एम्ससह इतर महत्त्वाच्या संस्था विदर्भात पळवून नेण्यात येत आहे. त्यात आणखी भाषा विद्यापीठाची भर पडली. अनेक दशकांपासून भाषा विद्यापीठ अंबाजोगाई व्हावे, अशी मागणी आहे. त्या मागणीला आधारही आहे. तरीही हे विद्यापीठ विदर्भात पळवून नेण्यात आले. हा मराठवाड्यावर ठरवून केलेला अन्याय आहे.- डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद, शाखा अंबाजोगाई

टॅग्स :marathiमराठीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद