शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या

By बापू सोळुंके | Updated: April 22, 2023 20:02 IST

मराठा समाजाला  मिळालेलेे एसईबीसी आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने मे २०२०मध्ये रद्द केले.  यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली.

छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार शनिवारी सकल मराठा समाजाच्या बैठकीत  करण्यात आला.

मराठा समाजाला  मिळालेलेे एसईबीसी आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने मे २०२०मध्ये रद्द केले.  यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली. यापार्श्वभूमीवर शहरातील सकल मराठा समाजाची  शनिवारी सायंकाळी जिजामाता कन्या विद्यालयात बैठक झाली. प्रा. चंद्रकांत भराट यांनी बैठकीचे प्रास्तविक करताना राज्यसरकारने क्युरेटीव याचिका दाखल करण्याचा आणि नवीन आयोग नेमण्याच्या निर्णय कसा वाटतो, यावर चर्चा केली. तर डॉ. शिवानंद भानुसे यांनी एसईबीसी हे आरक्षण आपण मान्य केले नसते तर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाला  असता.   मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.  

किशोर चव्हाण यांनी राज्यशासनाने मार्च महिन्यात घेतलेल्या बैठकीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याठी सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमल्याचे सांगितले. राजेंद्र दाते पाटील यांनी क्युरेटीव याचिकेद्वारेही आपण आपले आरक्षण टिकवू शकतो,असे सांगितले. ॲड. सुवर्णा मोहिते,  म्हणाल्या की, केवळ दलालांमुळे आपल्या मुलांना आरक्षण मिळू शकले नसल्याबद्दल त्यांनी खंत  व्यक्त केली. राजेंद्र दाते पाटील यांनी क्युरेटीव याचिकेद्वारेही आपण आपले आरक्षण टिकवू शकतो, असे सांगितले.   मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा,या मागणीसाठी राज्यशासनाविरोधात १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या  आंदोलन  करण्याचा  निर्णय घेण्यात आला. कोणीही राज्यसरकाशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाऊ नये, तर शासनाला येथे येण्यास भाग पाडावे,असे यावेळी ठरले. या वेळी सुरेश वाकडे, दिव्या पाटील, रेखा वाहटुळे, रवी काळे, सतीश वेताळ, अमोल सोळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद