शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

'अकरावी शहरात, तर बारावी खेड्यात'; आता विनाकारण महाविद्यालय बदलण्यास बसणार चाप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:55 IST

मागील काही वर्षांपासून बारावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रामीण भागाकडे वाढला आहे.

ठळक मुद्देशहरातील मुलांना ग्रामीणमध्ये प्रवेश घेताना द्यावे लागणार ठोस कारण तळ्यात-मळ्यात करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणार अडचणी

औरंगाबाद : टक्केवारी मिळणे, कॉपी करण्याच्या आशेमुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी झाल्यानंतर बारावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असतो. यात अनेक अडचणीही निर्माण होतात. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने ही प्रक्रिया महाविद्यालय पातळीवर पूर्ण करण्याची परवानगी देतानाच ठोस कारणाशिवाय अकरावीच्या विद्यार्थ्यास टीसी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. 

मागील काही वर्षांपासून बारावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रामीण भागाकडे वाढला आहे. मात्र, २०२०-२१ या नवीन शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे; परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना ठोस कारण द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून काही ठोस कारणे असतील तरच विद्यार्थ्यांना कॉलेज बदलता येईल, असे सांगितले आहे. त्यामध्ये सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे,  शाखा बदलून मिळणे, विद्यार्थ्याचा राहण्याचा पत्ता बदलणे, इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यास बोर्ड बदलायचे असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून दाखला दिला जाईल. मात्र, त्यासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या डेटाबेसमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही महाविद्यालयांनी करणे आवश्यक असल्याचेही राज्य शासनाने शिक्षण विभागाला पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून कार्यवाहीबारावीत उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी विविध कारणास्तव बारावीत कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत आॅनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत होती. मात्र, यंदापासून महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद