शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

'अकरावी शहरात, तर बारावी खेड्यात'; आता विनाकारण महाविद्यालय बदलण्यास बसणार चाप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:55 IST

मागील काही वर्षांपासून बारावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रामीण भागाकडे वाढला आहे.

ठळक मुद्देशहरातील मुलांना ग्रामीणमध्ये प्रवेश घेताना द्यावे लागणार ठोस कारण तळ्यात-मळ्यात करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणार अडचणी

औरंगाबाद : टक्केवारी मिळणे, कॉपी करण्याच्या आशेमुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी झाल्यानंतर बारावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असतो. यात अनेक अडचणीही निर्माण होतात. या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने ही प्रक्रिया महाविद्यालय पातळीवर पूर्ण करण्याची परवानगी देतानाच ठोस कारणाशिवाय अकरावीच्या विद्यार्थ्यास टीसी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. 

मागील काही वर्षांपासून बारावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा ग्रामीण भागाकडे वाढला आहे. मात्र, २०२०-२१ या नवीन शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे; परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना ठोस कारण द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून काही ठोस कारणे असतील तरच विद्यार्थ्यांना कॉलेज बदलता येईल, असे सांगितले आहे. त्यामध्ये सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे,  शाखा बदलून मिळणे, विद्यार्थ्याचा राहण्याचा पत्ता बदलणे, इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यास बोर्ड बदलायचे असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून दाखला दिला जाईल. मात्र, त्यासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या डेटाबेसमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही महाविद्यालयांनी करणे आवश्यक असल्याचेही राज्य शासनाने शिक्षण विभागाला पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून कार्यवाहीबारावीत उत्तीर्ण होण्यासाठी दरवर्षी विविध कारणास्तव बारावीत कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत आॅनलाईन प्रक्रिया पार पाडावी लागत होती. मात्र, यंदापासून महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद