शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तारातून वीज प्रवाही, पण रेल्वे अजूनही डिझेलवरच; मंजुरी रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ 

By संतोष हिरेमठ | Updated: September 19, 2023 19:20 IST

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण, पण विजेवर धावेना रेल्वे

छत्रपती संभाजीनगर : विद्युतीकरणाच्या कामाने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन महिन्यांपूर्वी मनमाड (अंकाई)- छत्रपती संभाजीनगर-जालना या १७४ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आणि हा मार्ग इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाला. मात्र, दोन महिन्यांनतरही इलेक्ट्रिक इंजिनची एकप्रकारे वीज ‘गूल’ झालेली असून, रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ मंजुरी अडकली आहे.

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण होताच पहिल्यांदा जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस विजेवर धावेल, असे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले. इलेक्ट्रिक इंजिनमुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते. रेल्वेच्या इंधन खर्चातही बचत होते. दोन महिन्यांनंतरही ही रेल्वे विजेवर धावण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. मराठवाड्याकडे दक्षिण मध्य रेल्वेकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. विद्युतीकरण होऊनही रेल्वे सुरू करण्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे रेल्वे संघटनांतून म्हटले जात आहे.

असे झाले रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण- अंकाई (मनमाड) - छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १११ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- छत्रपती संभाजीनगर - दिनागाव दरम्यानचे ५६ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- दिनागाव - जालना दरम्यानचे ७ कि.मी.चे विद्युतीकरण १७ जुलै रोजी पूर्ण.- जालना - परभणी - मुदखेड - धर्माबाद दरम्यानचे २४६ किलोमीटरचे विद्युतीकरण २०२३ अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य.

सर्व तयारी झाली, लवकरच विजेवर रेल्वेसर्व तयारी झालेली आहे. जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच विजेवर रेल्वे धावेल. जनशताब्दी एक्स्प्रेसमध्य रेल्वेकडे धावते. त्यामुळे मध्य रेल्वेशीही समन्वय साधला जात आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजूरी येताच इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावेल.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग, दमरे

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन