शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तारातून वीज प्रवाही, पण रेल्वे अजूनही डिझेलवरच; मंजुरी रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ 

By संतोष हिरेमठ | Updated: September 19, 2023 19:20 IST

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण, पण विजेवर धावेना रेल्वे

छत्रपती संभाजीनगर : विद्युतीकरणाच्या कामाने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेवर रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन महिन्यांपूर्वी मनमाड (अंकाई)- छत्रपती संभाजीनगर-जालना या १७४ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आणि हा मार्ग इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाला. मात्र, दोन महिन्यांनतरही इलेक्ट्रिक इंजिनची एकप्रकारे वीज ‘गूल’ झालेली असून, रेल्वे बोर्डाच्या ‘यार्डात’ मंजुरी अडकली आहे.

जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण होताच पहिल्यांदा जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस विजेवर धावेल, असे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले. इलेक्ट्रिक इंजिनमुळे रेल्वेच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते. रेल्वेच्या इंधन खर्चातही बचत होते. दोन महिन्यांनंतरही ही रेल्वे विजेवर धावण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. मराठवाड्याकडे दक्षिण मध्य रेल्वेकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. विद्युतीकरण होऊनही रेल्वे सुरू करण्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे रेल्वे संघटनांतून म्हटले जात आहे.

असे झाले रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण- अंकाई (मनमाड) - छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १११ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- छत्रपती संभाजीनगर - दिनागाव दरम्यानचे ५६ कि.मी.चे विद्युतीकरण मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले.- दिनागाव - जालना दरम्यानचे ७ कि.मी.चे विद्युतीकरण १७ जुलै रोजी पूर्ण.- जालना - परभणी - मुदखेड - धर्माबाद दरम्यानचे २४६ किलोमीटरचे विद्युतीकरण २०२३ अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य.

सर्व तयारी झाली, लवकरच विजेवर रेल्वेसर्व तयारी झालेली आहे. जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच विजेवर रेल्वे धावेल. जनशताब्दी एक्स्प्रेसमध्य रेल्वेकडे धावते. त्यामुळे मध्य रेल्वेशीही समन्वय साधला जात आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजूरी येताच इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावेल.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग, दमरे

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन