शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

औरंगाबादमध्ये रिमोटद्वारे वीजचोरीचा पथकाकडून पर्दाफाश; चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:53 IST

महावितरणने वीज चोरांविरोधात  सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे.

औरंगाबाद : महावितरणने वीज चोरांविरोधात  सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. औरंगाबाद व वैजापूर शहरात रिमोटद्वारे मीटर बंद करून जवळपास पाच लाख रुपयांची वीजचोरी केल्याची दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. वीजचोरी करणारांसह रिमोट पुरविणाऱ्या चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

औरंगाबादेतील जुनाबाजारात महावितरणचे पथक तपासणी करीत होते. अजीम कॉलनीतील वीज ग्राहक नजीमोद्दीन सिद्दीकी यांचे मीटर बंद असल्याचे दिसले. हे मीटर सिद्दीकी मोहंमद मुजफ्फरुद्दीन वापरत होते. मुजफ्फरुद्दीन यांना विचारले असता त्यांनी बाजूच्या खोलीतून लाल रंगाचे रिमोट आणून बंद असलेले मीटर चालू केले.  दोन मजली घरासह दुकानातील ९ ट्यूब, ६ पंखे, २ फ्रीज, २ गिझर, २ वॉशिंग मशीन, १ डीप फ्रीझर, १ एअरकंडिशनर, १ इंडक्शन हीटर (शेगडी) व १ टीव्ही या उपकरणांचा वापर करून तब्बल २४ हजार ७०३ युनिट अर्थात ४ लाख ४६ हजार ७०० रुपये एवढी वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. 

महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी, सहायक अभियंता महेश सोनार, प्रधान तंत्रज्ञ सुनील राठोड, वरिष्ठ तंत्रज्ञ पुंडलिक चव्हाण, तंत्रज्ञ आय. एस. खान, विद्युत सहायक मनोज वसावे, नैना कुडमते यांनी ही कारवाई केली.

दुसरी कारवाई वैजापूरातील  शिक्षक कॉलनीतील किसन सोनवणे यांच्यावर करण्यात आली. या वीज ग्राहकाने  फेरफार करून मीटर रीडिंग बंद करण्याचे कीट बसवले होते. तो कीटच्या साह्याने रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याचे पथकास आढळले. सोनवणे यांनी २७२८ युनिटची वीजचोरी केली असून, ही रक्कम ४३ हजार ५२८ रुपये एवढी आहे. या वीज ग्राहकास सुधीर लाळे याने रिमोट विकले होते. या दोघांवरही गंगापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी