शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

छत्रपती संभाजीनगरहून विजेवर मालगाड्या धावताहेत, लवकरच प्रवासी रेल्वेही धावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:56 IST

वर्षाअखेरपर्यंत नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनचेही काम लवकरच

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशनच्या नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया संबंधित विभागाकडून होणार असून, वर्षाअखेरपर्यंत रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात होईल. सध्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाड्या धावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक सुरळीत होताच प्रवासी रेल्वेही विजेवर चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह प्रवासी रेल्वे धावताना दिसेल. तर डिसेंबर अखेरपर्यंत नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या.

'डीआरएम'पदी रुजू झाल्यानंतर नीती सरकार यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर सोयीसुविधांची पाहणी केली. रेल्वेस्टेशनवर आगामी कालावधीत कोणत्या प्रवासी सुविधा वाढणार आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. रेल्वेस्टेशनची पाहणी केल्यानंतर नीती सरकार यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत रेल्वे विभागाच्या माल वाहतुकीसंदर्भातील विविध योजनांची माहिती त्यांनी उद्योजकांना दिली. उद्योजकांच्या रेल्वेकडून अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष नितीन गुप्ता, अर्पित सावे, आशिष गर्दे, शिवप्रसाद जाजू, मिलिंद कंक, विनायक देवळाणकर, राजेंद्र मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.

विद्युतीकरणाची काय स्थिती?पत्रकारांशी बोलताना निती सरकार म्हणाल्या, मनमाड ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर ते करमाड टप्पाही झाला असून, करमाड ते जालना दरम्यानचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत संपूर्ण नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण होईल. आजघडीला छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाड्या धावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक व्यवस्थित झाल्यानंतर प्रवासी रेल्वेही विद्युतीकरणावर चालविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

अचानक दौरा, अस्वच्छतेविषयी कानउघाडणीनीती सरकार यांचा हा दौरा गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर त्या दाखल झाल्या. अगदी सकाळीच रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी येताच जागोजागी अस्वच्छता पाहून त्या चांगल्याच भडकल्या. अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. सायंकाळपर्यंत साफसफाई करून दुरवस्था दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबाद