शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

छत्रपती संभाजीनगरहून विजेवर मालगाड्या धावताहेत, लवकरच प्रवासी रेल्वेही धावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:56 IST

वर्षाअखेरपर्यंत नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनचेही काम लवकरच

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशनच्या नवीन इमारतीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया संबंधित विभागाकडून होणार असून, वर्षाअखेरपर्यंत रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या कामाला सुरुवात होईल. सध्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाड्या धावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक सुरळीत होताच प्रवासी रेल्वेही विजेवर चालविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह प्रवासी रेल्वे धावताना दिसेल. तर डिसेंबर अखेरपर्यंत नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण होईल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार म्हणाल्या.

'डीआरएम'पदी रुजू झाल्यानंतर नीती सरकार यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर सोयीसुविधांची पाहणी केली. रेल्वेस्टेशनवर आगामी कालावधीत कोणत्या प्रवासी सुविधा वाढणार आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. रेल्वेस्टेशनची पाहणी केल्यानंतर नीती सरकार यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत रेल्वे विभागाच्या माल वाहतुकीसंदर्भातील विविध योजनांची माहिती त्यांनी उद्योजकांना दिली. उद्योजकांच्या रेल्वेकडून अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष नितीन गुप्ता, अर्पित सावे, आशिष गर्दे, शिवप्रसाद जाजू, मिलिंद कंक, विनायक देवळाणकर, राजेंद्र मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.

विद्युतीकरणाची काय स्थिती?पत्रकारांशी बोलताना निती सरकार म्हणाल्या, मनमाड ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर ते करमाड टप्पाही झाला असून, करमाड ते जालना दरम्यानचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत संपूर्ण नांदेड विभागात १०० टक्के विद्युतीकरण होईल. आजघडीला छत्रपती संभाजीनगर ते मुंबईदरम्यान इलेक्ट्रिक इंजिनसह मालगाड्या धावत आहेत. मालगाड्यांची वाहतूक व्यवस्थित झाल्यानंतर प्रवासी रेल्वेही विद्युतीकरणावर चालविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

अचानक दौरा, अस्वच्छतेविषयी कानउघाडणीनीती सरकार यांचा हा दौरा गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर त्या दाखल झाल्या. अगदी सकाळीच रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी येताच जागोजागी अस्वच्छता पाहून त्या चांगल्याच भडकल्या. अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. सायंकाळपर्यंत साफसफाई करून दुरवस्था दूर करण्यास सांगितले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबाद