शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

मी पाहिलेली निवडणूक...ना जात, ना धर्म केवळ आपला देश अन् समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:41 IST

प्रचारासाठी कोणाकडेही गाड्या नव्हत्या. पायी चालत जाऊन, ठिकठिकाणी खळीने पोस्टर चिकटवून प्रचार केला जात होता.

औरंगाबादच्या इतिहासात १९६२ साली लोकसभा निवडणुकीत मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्रात सुवर्णपदक पटकावलेले स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ आणि बॅरिस्टर होऊन भारतात परतलेले रफिक झकेरिया यांच्यात लढत होती. दोघेही उच्चविद्याविभूषित होते. सुसंस्कृत, लोकशाही मानणारे आणि जनतेच्या प्रश्नावर झगडणे हाच त्यांचा पिंड होता.

काँग्रेसकडून रफिक झकेरिया यांना उमेदवारी मिळाली, तर संयुक्त महाराष्ट्रवादी गटाकडून गोविंदभाई श्रॉफ लढत होते. गोविंदभार्इंच्या प्रचारात मी सक्रिय होतो. शालेय जीवनापासून हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा, संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा प्रभाव माझ्यावर पडलेला होता. घरातील सर्व जण काँग्रेसचे खंदे समर्थक, माझा सख्खा चुलत भाऊ काँग्रेसचा आमदार. तरीही समाजवादी विचारांमुळे गोविंदभार्इंच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग नोंदवला. प्रचारात आपला देश आणि समाज याचा विकास कसा करणार, यावर दोन्ही उमेदवारांचा भर होता. प्रचारासाठी कोणाकडेही गाड्या नव्हत्या. पायी चालत जाऊन, ठिकठिकाणी खळीने पोस्टर चिकटवून प्रचार केला जात होता.

गोविंदभाई आणि रफिक झकेरिया यांच्या भाषणात लोकशाही टिकली पाहिजे, रुजली पाहिजे, त्यासाठी निवडणुकीत प्रत्येकाने सहभागी होत हातभार लावण्याचे आवाहन केले जाई. कोणावरही व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. कोणाला पोलिसांची भीती नव्हती. सगळे खेळीमेळीचे वातावरण होते. कोणी जात-पात काढत नव्हते. धर्माच्या नावावर मतदानही होत नसे, त्या प्रकारचा प्रचारही होत नव्हता. या निवडणुकीत गोविंदभार्इंचा पराभव झाला. या पराभवाचे थोडेही दु:ख, शल्य त्यांना नव्हते. निकालाच्या दुसऱ्या दिवशी गोविंदभाई स.भु. संस्थेत आपल्या कामाला लागले. तेव्हा ते अध्यक्ष नव्हते. मात्र, त्या ठिकाणाहूनच त्यांची विविध कामे चालत होती. रफिक झकेरिया यांनाही गोविंदभाई यांच्याविषयी प्रचंड आदर होता. विजयी झाल्यानंतर त्यांनीही तात्काळ गोविंदभार्इंची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्रितपणे आवर्जून हजेरी लावली.

आम्ही रफिक झकेरिया यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांना आम्हा युवकांचा ग्रुपही माहीत होता. तरीही आम्ही बोलावलेल्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत. प्रेमाने बोलत. कटुता नावाचा प्रकारच नव्हता. कधीही विरोधकांची वागणूक मिळाली नाही. निवडणुका संपल्या की, सर्व संपून जायचे. हा काळच तसा होता. १९५७ साली सेलू येथे शाळेत शिकत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणानंतर विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी शामराव बोधनकर, विनायकराव चारठाणकर, गीताबाई चारठाणकर यांचा आमच्यावर प्रभाव होता. नरहर कुरुंदकर, ना.य. डोळे, बापू काळदाते हेसुद्धा सेलूवरून येऊन व्याख्याने देत होती. तेव्हाच्या निवडणुकीत शिक्षकांच्या सांगण्यावरून शेकापचा प्रचार केला होता. या प्रचारात पोस्टर चिकटवणे, भाड्याने सायकल घेऊन संबंधिताला निरोप पोहचवणे, अशी कामे केली. सेलूत क्रांतीसिंह नाना पाटील, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे आदींच्या सभा व्हायच्या. त्यातही  लोकशाही रुजविण्यासाठी श्रीमंती, घराणेशाही असलेल्या उमेदवारांचा पराभाव करा, असे आवाहन नेत्यांकडून केले जायचे. विरोध हा तात्पुरता होता.

१९६२ साली औरंगाबादेत निवडणूक प्रचारात सहभागी झाल्यानंतर पुढे पुण्याला शिकण्यास गेलो. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा संबंध आला नाही; पण सद्य:स्थितीत लोकशाहीबद्दल खरंच चिंता वाटायला लागली आहे. आजच्या युवकांना स्वत:चे हक्क, लोकशाही याविषयी कोणतेही गांभीर्य उरले नाही. समाज तशा अर्थाने जागरूक झालाच नाही, अशी माझी ठाम धारणा झाली आहे. ७० वर्षांत रुजवलेली लोकशाही टिकली पाहिजे, वाढविली पाहिजे, असे वाटते.

( शब्दांकन : राम शिनगारे )

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण