शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

मतदारांच्या पळवापळवीच्या मनसुब्यांना निवडणूक आयोगाचा लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:53 IST

महापालिका निवडणुकीत अनेकांचे गणित बिघडणार

ठळक मुद्दे३१ जानेवारीपर्यंतची यादीच गृहीत धरणार १ फेब्रुवारीपासूनच्या अर्जांचा विचार होणार नाही

- विकास राऊत 

औरंगाबाद : महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार पळवापळवी (स्थलांतर) करून विजयाचे गणित आखणाऱ्यांच्या मनसुब्यांना निवडणूक आयोगानेच लगाम घातला आहे. ३१ जानेवारी २०२० पर्यंतची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात यावी, असे राजपत्र जारी केले आहे. या तारखेनंतर फक्त नवमतदारांच्या नोंदणीचाच विचार कागदपत्र तपासून करावा, अशा सूचना आयोगाकडून आल्या आहेत. 

मतदारांची पळवापळवी, बीएलओंचे दुर्लक्ष याबाबत लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून निवडणूक विभागाचे लक्ष वेधले होते. याबाबत उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी मतदार नोंदणी यंत्रणेला गांभीर्याने कागदपत्र तपासण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान आयोगानेच याबाबत राजपत्राद्वारे ३१ जानेवारी २०२० पर्यंतची मतदार यादी वापरण्याबाबत आदेशित केले आहे. मनपा निवडणुकीत २२ अनुसूचित जातींसाठी, ३१ ओबीसी प्रवर्गांसाठी आरक्षित झाले आहेत. आरक्षित वॉर्डात दुसऱ्या वॉर्डांतील ओळखीचे मतदार स्थलांतरित करायचे. जेणेकरून निवडणुकीत त्या मतदारांचे १०० टक्के मतदान पदरात पाडून घ्यायचे आणि विजयी व्हायचे. यासाठी काही इच्छुकांनी बीएलओंना हाताशी धरून तयारी सुरू केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने आलेल्या तक्रारींच्या आधारे लोकमतने मतदारांच्या पळवापळवीवर वृत्त प्रकाशित केले. त्या वृत्ताचा आधार घेऊन काही नागरिकांनी आयोगाकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. 

महापालिका निवडणूक विभागाचे मत असेमहापालिकेचे उपायुक्त कमलाकर फड यांनी नमूद केले की, ३१ जानेवारीनंतर जे अर्ज आले आहेत, त्यांचा विचार केला जाणार नाही. त्या तारखेपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, तीच यादी मनपाकडे हस्तांतरित होईल. यावेळी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचाच एसडीओंनी विचार केलेला आहे. स्थलांतरित अर्जांचा विचार मोठ्या प्रमाणात झाला असेल असे वाटत नाही. अंतिम यादी तयार करताना ३१ जानेवारी २०२० पर्यंतच्या अर्जांचाच विचार होईल. त्यानंतर कुणीही अर्ज आणून दिले तरी त्याचा विचार होणार नाही. १ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या कोणत्याही अर्जांचादेखील मतदार यादीत विचार होणार नाही.

उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती अशीउपविभागीय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले की, आयोगाने मार्च-एप्रिल-२०२० मध्ये होणाऱ्या मनपा, जि.प., पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकांसाठी ३१ जानेवारी- २०२०  या तारेखपर्यंतची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी असलेली मतदार यादी वापरावी. आयोगाने याबाबत विधानसभा मतदारसंघ क्रमांकनिहाय माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागविली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना कळविण्यात आले आहे. परिणामी १ फेब्रुवारीनंतरची नावे सदरील निवडणुकीच्या यादीत येणार नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक