शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
6
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
7
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
8
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
9
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
10
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
11
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
12
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
13
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
14
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
15
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
16
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
17
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
18
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
19
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:55 IST

लोकमत एक्सप्लेनर: पावसाळा, युद्धजन्य पार्श्वभूमी, जनगणना यांचा निवडणुकांवर परिणाम होणार का?

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग एक ते दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. विभागीय आयुक्तालयात मंगळवारी दुपारी राज्य निवडणूक आयुक्त डी. टी. वाघमारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींची बैठकीला उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीसाठी प्रशासन तयार असल्याचे त्यांना सांगितले. चार महिन्यांत निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर आयोग वरिष्ठ पातळीवर विचार करील. निकाल पूर्णपणे वाचला नसल्याने आयुक्तांनी बैठकीत काही स्पष्टीकरण दिले नाही. ग्रामपंचायत सरपंच आरक्षण प्रक्रिया, मतदार यादीच्या तयारीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. १ जानेवारी २०२५ पर्यंतची मतदार यादी निवडणुकीसाठी गृहीत धरली जाईल. तीन याचिकांतर्गत येणाऱ्या ईव्हीएम वगळून बाकीच्या मतदानाला वापरता येतील. साधारणत: ऑक्टोबरमध्ये निवडणुका होेणे शक्य आहे.

लोकमत एक्सप्लेनर...पावसाळा, युद्धजन्य पार्श्वभूमी, जनगणना यांचा निवडणुकांवर परिणाम होणार का?राज्य निवडणूक आयोग कोर्टात एक ते दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी विनंती याचिका दाखल करू शकते. पुढच्या महिन्यापासून पावसाळा सुरू होणार असल्यामुळे निवडणुका लगेच होणार नाहीत. ऑक्टोबरनंतरच प्रक्रियेला वेग येईल.

संभाव्य भारत-पाक युद्धाचा परिणाम...भारत-पाक युद्धाचे ढग सध्या दाटून आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत परिस्थितीचा विचार केला, तर या निवडणुकांबाबत लगेचच निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.

जनगणनेचा अडसर असू शकतो का...जातीनिहाय जनगणना करण्याची केंद्र शासनाने घोषणा केली आहे. जनगणनेबाबत जर पुढील महिन्यात सुरुवात करण्याचा अध्यादेश आला, तरीही निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल.

परिसीमन आयोगाचे काम केव्हा...परिसीमन आयोगाचे कामकाज सुरू होण्यास खूप वेळ आहे. त्याचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा काहीही संबंध नाही, असेही विधिज्ञांचे मत आहे.

विधिज्ञांच्या मते हा निकाल कसा...सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल घटनेच्या चौकटीतील आहे. संभाव्य युद्धजन्य परिस्थिती, जातीनिहाय जनगणना, परिसीमन आयोगाच्या कामकाजाचा आणि या निवडणुकांचा काहीही संबंध नाही. ही लोकशाही प्रक्रिया आहे. ती चालू राहिली पाहिजे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हाती या संस्था असाव्यात. २०२२ पूर्वी आरक्षणाची जी परिस्थिती होती. त्यानुसार निवडणुका घेण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तांत्रिक मुद्दे आगामी काळात निकाली निघतील.- ॲड. सगर किल्लारीकर, ज्येष्ठ विधिज्ञ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका