शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:55 IST

लोकमत एक्सप्लेनर: पावसाळा, युद्धजन्य पार्श्वभूमी, जनगणना यांचा निवडणुकांवर परिणाम होणार का?

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग एक ते दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. विभागीय आयुक्तालयात मंगळवारी दुपारी राज्य निवडणूक आयुक्त डी. टी. वाघमारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींची बैठकीला उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीसाठी प्रशासन तयार असल्याचे त्यांना सांगितले. चार महिन्यांत निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर आयोग वरिष्ठ पातळीवर विचार करील. निकाल पूर्णपणे वाचला नसल्याने आयुक्तांनी बैठकीत काही स्पष्टीकरण दिले नाही. ग्रामपंचायत सरपंच आरक्षण प्रक्रिया, मतदार यादीच्या तयारीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. १ जानेवारी २०२५ पर्यंतची मतदार यादी निवडणुकीसाठी गृहीत धरली जाईल. तीन याचिकांतर्गत येणाऱ्या ईव्हीएम वगळून बाकीच्या मतदानाला वापरता येतील. साधारणत: ऑक्टोबरमध्ये निवडणुका होेणे शक्य आहे.

लोकमत एक्सप्लेनर...पावसाळा, युद्धजन्य पार्श्वभूमी, जनगणना यांचा निवडणुकांवर परिणाम होणार का?राज्य निवडणूक आयोग कोर्टात एक ते दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, यासाठी विनंती याचिका दाखल करू शकते. पुढच्या महिन्यापासून पावसाळा सुरू होणार असल्यामुळे निवडणुका लगेच होणार नाहीत. ऑक्टोबरनंतरच प्रक्रियेला वेग येईल.

संभाव्य भारत-पाक युद्धाचा परिणाम...भारत-पाक युद्धाचे ढग सध्या दाटून आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत परिस्थितीचा विचार केला, तर या निवडणुकांबाबत लगेचच निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.

जनगणनेचा अडसर असू शकतो का...जातीनिहाय जनगणना करण्याची केंद्र शासनाने घोषणा केली आहे. जनगणनेबाबत जर पुढील महिन्यात सुरुवात करण्याचा अध्यादेश आला, तरीही निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल.

परिसीमन आयोगाचे काम केव्हा...परिसीमन आयोगाचे कामकाज सुरू होण्यास खूप वेळ आहे. त्याचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा काहीही संबंध नाही, असेही विधिज्ञांचे मत आहे.

विधिज्ञांच्या मते हा निकाल कसा...सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल घटनेच्या चौकटीतील आहे. संभाव्य युद्धजन्य परिस्थिती, जातीनिहाय जनगणना, परिसीमन आयोगाच्या कामकाजाचा आणि या निवडणुकांचा काहीही संबंध नाही. ही लोकशाही प्रक्रिया आहे. ती चालू राहिली पाहिजे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हाती या संस्था असाव्यात. २०२२ पूर्वी आरक्षणाची जी परिस्थिती होती. त्यानुसार निवडणुका घेण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तांत्रिक मुद्दे आगामी काळात निकाली निघतील.- ॲड. सगर किल्लारीकर, ज्येष्ठ विधिज्ञ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिका