शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

शिंदेंची कृती म्हणजे शिवसैनिकांच्या मनातील खदखद; बाळासाहेबांसोबत काम केलेल्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:32 IST

आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आज सत्ता स्थापन करणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही.

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत औरंगाबाद शहरातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी काम केले. शिवसेनेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी त्यावेळी शिवसैनिकांमध्ये होती. काळानुसार शिवसेना बदलत गेली. आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आज सत्ता स्थापन करणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. आता अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी जे पाऊल उचलले, ती प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील खदखद असल्याचे मत बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिकांनी व्यक्त केले.

काँग्रेससोबत जाणे हेच चुकलेशिवसेनेच्या स्थापनेपूर्वीपासून मी काम करीत होतो. पहिला जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. २०० पेक्षा जास्त केसेस माझ्यावर झाल्या. आयुष्यभर प्रस्थापित काँग्रेसशी लढलो. नंतर राष्ट्रवादीसोबत लढाई केली. अचानक सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. नेतृत्वापुढे कोणालाही काहीही बोलता येत नव्हते. मागील अडीच वर्षांत मंत्रालयात जिकडे तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आमदारांना एकमेव शिंदेच भेटत असत. मुख्यमंत्रीही भेटत नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी ही टोकाची भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका म्हणजे समस्त शिवसैनिकांच्या मनातील खदखद आहे.- सुभाष पाटील, पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख

शिवसेना हळूहळू संपेल का?महापालिकेत १९८८ पासून २००० पर्यंत विविध पदांवर काम केले. हिंदुत्वासाठी जिवाचे रान केले. आज शिवसेनेची ही वाताहत पाहून खूपच वाईट वाटते. एकेकाळी शिवसेना म्हणजे आग होती. आज पक्षाची अवस्था बघा. शरद पवार यांनी जाणीवपूर्वक शिवसेना संपविण्यासाठी महाविकास आघाडी केली. त्याला संजय राऊत यांनी शह दिला. शिवसेनेचा प्रवास असाच सुरू राहिला तर एक दिवस खूप वाईट येईल. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हा निर्णय चुकला.- अविनाश कुमावत, माजी सभापती, स्थायी समिती

शिवसेना म्हणजे कडवट हिंदुत्वशिवसेना कोणत्या मुद्द्यावर वाढली तर कडवट हिंदुत्व या एकमेव शब्दावर होय. अलीकडे शिवसेनेचा प्रवास बघितला तर तो अत्यंत चुकीचा आहे. एमआयएमच्या आमदारांची मते घेतली. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही सेनेने एमआयएम नगरसेवकांची मते घेतली. बाळासाहेब नेहमी सांगत असत, काहीही झाले तरी काँग्रेससोबत जाणार नाही. शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. शिवसैनिकांच्या मनातील ही मूळ खदखद बाहेर आली.- राधाकृष्ण गायकवाड, माजी सभागृह नेता

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ