शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

दिल्लीहून रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:55 IST

दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथील व्हायरस अत्यंत गंभीर स्वरूपाचा असू शकतोया व्हायरसने औरंगाबादमध्ये शिरकाव केल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते

औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या २६७ प्रवाशांची सोमवारी  औरंगाबाद रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल आठ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. 

दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. सोमवारी सचखंड एक्सप्रेसने शहरात २६७ प्रवासी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज महापालिकेला प्राप्त झाला. त्यातील आठ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

मंगळवारी सचखंड एक्सप्रेसने १९७ प्रवासी दाखल झाले. त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी त्याचा अहवाल प्राप्त होईल. मंगळवारी चिकलठाणा विमानतळावर दिल्लीहून आलेल्या तब्बल ५१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. दिल्लीत ज्या पद्धतीने कोरोना पसरत आहे, त्यामुळे तेथील व्हायरस अत्यंत गंभीर स्वरूपाचा असू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला. या व्हायरसने औरंगाबाद शहरात शिरकाव केल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ