शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शासनाचे प्रयत्न तोकडे; मराठवाड्यात पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By बापू सोळुंके | Updated: June 17, 2023 16:09 IST

अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात असला तरी शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. मागील पाच महिन्यांत मराठवाड्यात ३९१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९८, तर धाराशिव जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षी अतिवृष्टीसोबत संततधार पावसामुळे मराठवाड्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात काहीच लागले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र, ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पदरमोड करून पीकविमा काढला होता. विमा कंपनी दरवर्षी मेअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत असते; परंतु यंदा आतापर्यंत पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिले नाही.

अवकाळी आणि गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्न अपुरे पडत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत मराठवाड्यातील ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे.

निम्म्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुदानास पात्रआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून सानुग्रह एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी २३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषात बसत असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र शासनाच्या निकषात बसत नसल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदान नाकारण्यात आले आहे, तर ९८ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चौकशी महसूल आणि पोलिस विभागाकडून सुरू आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या?औरंगाबाद --५०जालना--- २५परभणी-- ३२हिंगोली-- १३नांदेड-- ६४बीड-- ९८लातूर-- २८धाराशिव--- ८०

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा