शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शासनाचे प्रयत्न तोकडे; मराठवाड्यात पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन

By बापू सोळुंके | Updated: June 17, 2023 16:09 IST

अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात असला तरी शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. मागील पाच महिन्यांत मराठवाड्यात ३९१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९८, तर धाराशिव जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षी अतिवृष्टीसोबत संततधार पावसामुळे मराठवाड्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात काहीच लागले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र, ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पदरमोड करून पीकविमा काढला होता. विमा कंपनी दरवर्षी मेअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत असते; परंतु यंदा आतापर्यंत पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिले नाही.

अवकाळी आणि गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्न अपुरे पडत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत मराठवाड्यातील ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे.

निम्म्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुदानास पात्रआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून सानुग्रह एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी २३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषात बसत असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र शासनाच्या निकषात बसत नसल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदान नाकारण्यात आले आहे, तर ९८ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चौकशी महसूल आणि पोलिस विभागाकडून सुरू आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या?औरंगाबाद --५०जालना--- २५परभणी-- ३२हिंगोली-- १३नांदेड-- ६४बीड-- ९८लातूर-- २८धाराशिव--- ८०

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा