शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राजकारणातील ‘अंडरकरंट’ प्रवाहित करण्यासाठी बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 4:28 PM

वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.

ठळक मुद्देशांतीगिरी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष  समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत विचारमंथन

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २१ तारखेपर्यंत प्रचाराची मुदत असून, ११ दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. यादरम्यान ‘अंडरकरंट’ राजकारणासाठी बैठकींचे नियोजन करण्यात येत असून, मराठा समाजाने त्यामध्ये आघाडी घेतली आहे. समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत बैठकांमध्ये विचारमंथन होत आहे. विशेष करून वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.

बैठकींचे सत्र सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. शहरामध्ये पुढच्या आठवड्यापासून तयारी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आणि समाज या पार्श्वभूमीवरच या बैठकांचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या सगळ्या बैठकांच्या सत्रामध्ये शांतीगिरी मौनगिरी महाराजांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांतील प्रमुख उमेदवारांचे लक्ष लागले आहे. महाराज आणि जय बाबाजी परिवाराचे सर्व समाज समावेशक भक्त आहे. त्यामुळे महाराज काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. इतर समाज मतदारांच्या देखील छोटेखानी बैठका होत आहेत. त्यामध्येदेखील लोकसभा निवडणुकीचा अजेंडा राबविण्याबाबत चर्चा होत असल्याचे ऐकिवात आहे. 

शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या जरी आपापल्या पक्षाचे उपरणे घालून उमेदवारांचा प्रचार करीत असले तरी समाज म्हणून त्यांनाही बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकांचे स्वरूप व्यापक नसून छोटेखानीच असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वानुमते मोठा समाज मेळावादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

महाराजांनी अजून निर्णय घेतलेला नाहीशांतीगिरी मौनगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा सोशल मीडियात होती. याबाबत प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराजांनी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. महाराज पाठिंबा देण्याबाबत जाहीरपणे भूमिका मांडणार आहेत. सोशल मीडियातील माहिती चुकीची असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Politicsराजकारण