शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

पाणीपुरवठा वाढविण्याचा प्रयत्न, महापालिका जायकवाडीतून पाणी उपसा करणारे सर्व पंप बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:58 IST

Aurangabad Municipal Corporation trying to increase water supply सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देशहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल.अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २० एमएलडीने कसा वाढविता येईल, यादृष्टीने महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सोबत घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. जायकवाडीतून पाणी उपसा करणारे सर्व पंप जुने आहेत. त्यांची कार्यक्षमता संपली आहे. येथे नवीन पंप बसवून आवश्यक तेथे बायपास जलवाहिनी टाकून शहरासाठी पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. हा एक प्रयत्न आहे, तो कितपत यशस्वी होईल, हे सांगणे अवघड असल्याचे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या कमकुवत झाल्या आहेत. पाण्याचा किंचितही वेग वाढविला तर त्या फुटतात. अशा गंभीर परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा वाढविणे खूप आव्हानात्मक आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनाच पाणी वाढविण्याच्या संदर्भात सूचना केली आहे. तज्ज्ञ अधिकारी यावर अभ्यासही करीत आहेत. सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी आवश्यक विविध उपाययोजना करण्यात येतील. सर्वप्रथम जायकवाडीतील सर्व जुनाट पंप बदलून नवीन बसविण्यात येणार आहेत. जेथे जलवाहिनी खूपच कमजोर आहे, तेथे बायपास पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल. यापेक्षा जास्त पाण्याची वाढ करता येणार नाही, असे तज्ज्ञांनी मनपाला सांगितले आहे.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावदोन आठवड्यांपूर्वी मनपा प्रशासकांनी पाणीपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली. यामध्ये काही कनिष्ठ तर काही वरिष्ठ आहेत. अधिकाऱ्यांच्या आपसातील गटबाजीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या प्रकरणातही प्रशासक आता लक्ष घालणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी