शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पाणीपुरवठा वाढविण्याचा प्रयत्न, महापालिका जायकवाडीतून पाणी उपसा करणारे सर्व पंप बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:58 IST

Aurangabad Municipal Corporation trying to increase water supply सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देशहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल.अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव

औरंगाबाद : शहराचा पाणीपुरवठा २० एमएलडीने कसा वाढविता येईल, यादृष्टीने महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सोबत घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. जायकवाडीतून पाणी उपसा करणारे सर्व पंप जुने आहेत. त्यांची कार्यक्षमता संपली आहे. येथे नवीन पंप बसवून आवश्यक तेथे बायपास जलवाहिनी टाकून शहरासाठी पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. हा एक प्रयत्न आहे, तो कितपत यशस्वी होईल, हे सांगणे अवघड असल्याचे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या कमकुवत झाल्या आहेत. पाण्याचा किंचितही वेग वाढविला तर त्या फुटतात. अशा गंभीर परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा वाढविणे खूप आव्हानात्मक आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांनाच पाणी वाढविण्याच्या संदर्भात सूचना केली आहे. तज्ज्ञ अधिकारी यावर अभ्यासही करीत आहेत. सध्या शहराला १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यात आणखी वाढ करण्यासाठी आवश्यक विविध उपाययोजना करण्यात येतील. सर्वप्रथम जायकवाडीतील सर्व जुनाट पंप बदलून नवीन बसविण्यात येणार आहेत. जेथे जलवाहिनी खूपच कमजोर आहे, तेथे बायपास पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या पाण्यात २० एमएलडीची वाढ होईल. यापेक्षा जास्त पाण्याची वाढ करता येणार नाही, असे तज्ज्ञांनी मनपाला सांगितले आहे.

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभावदोन आठवड्यांपूर्वी मनपा प्रशासकांनी पाणीपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली. यामध्ये काही कनिष्ठ तर काही वरिष्ठ आहेत. अधिकाऱ्यांच्या आपसातील गटबाजीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या प्रकरणातही प्रशासक आता लक्ष घालणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादWaterपाणी