शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:53 IST

मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा आंदोलन : कायदा व सुव्यवस्थेसाठी निर्णय; विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुरुवारी (दि. ९) एक दिवसाकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत, तसेच याविषयीचे आदेश आपल्या स्तरावरून तातडीने निर्गमित करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये एक दिवसाची सुटी देण्याचा निर्णय घेतला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी गुरुवारी शैक्षणिक सुटी असल्यामुळे कामकाज होणार नसल्याचे पत्रही काढले आहे.जिल्ह्यातील शाळा बंद राहणार४जिल्ह्याधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे पत्र माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी काढले. या सुटीच्या दिवशीच्या अध्यापनाच्या तासिका इतर दिवशी अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण करण्याच्या सूचनाही डॉ. चव्हाण यांनी दिल्या. तसेच खासगी संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे.शांततेचे आवाहनराज्यस्तरीय बंद शांततेत पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने नागरिकांना बंद शांततेचे आवाहन केले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, बंद शांततेत पाळण्यात यावा, शासकीय, खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यात येऊ नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय शहरात शांततेसाठी तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.असा असेल पोलीस बंदोबस्त...पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, ६ सहायक आयुक्त.३० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि २ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ६२ चौकात फिक्स पॉइंटरॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची एक तुकडी तर राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या.ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ग्रामीण भागात १३४ पोलीस अधिकारी, १ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड जवान आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन