शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उच्च न्यायालयाच्या तत्परतेमुळे कैद्याला देता आला वडीलांना अग्नीडाग, सुटी असताना सुनावणी

By प्रभुदास पाटोळे | Updated: January 28, 2023 13:10 IST

शिक्षेला तात्पुरती स्थगिती अन् कैद्याला १५ दिवसांचा तात्पुरता जामीन

औरंगाबाद : अवघ्या आठ दिवसांपूर्वी कारागृहात गेलेल्या कैद्याच्या वडीलांचे शुक्रवारी निधन झाले. मात्र, उच्च न्यायालयाच्या तत्परतेमुळे त्या कैद्याला त्याच्या वडीलांना अग्नीडाग देता आला. कैद्याच्या अर्जाची तात्काळ दखल घेऊन औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी शुक्रवारी रात्रीच सदर प्रकरण न्यायमुर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाकडे वर्ग करुन शनिवारी सकाळी तातडीची सुनावणी ठेवली होती. शनिवारी (दि.२८) सुटी असताना खंडपीठाने सकाळी ८:३० वाजता तातडीने सुनावणी घेऊन वरीलप्रमाणे आदेश दिला. त्यामुळे त्या कैद्याला त्याच्या वडीलांचा अंत्यविधी व इतर धार्मीक विधी पार पाडता आले.

दुचाकींच्या अपघातात ‘मृत्यूस कारणीभूत’ ठरल्याच्या आरोपाखाली १९ जानेवारी २०२३ पासून कारावासाची शिक्षा भोगत असलेला कैदी प्रदिप अर्जून हवाळे (३३) याच्या वडीलांचे अवघ्या आठच दिवसात २७ जानेवारीला रात्री ८ वाजता निधन झाले. त्याला त्याच्या वडीलांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होता यावे यासाठी त्याने दाखल केलेल्या फौजदारी अर्जाची तात्काळ दखल घेत उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला १५ दिवसांची तात्पुरती स्थगिती (सस्पेन्ड) देऊन त्याला तात्पुरता जामीन मंजूर केला.

२ नोव्हेंबर २०१३ रोजी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात रविंद्र विठ्ठल शिंदे यांचे निधन झाले होते. रविंद्रच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली जामखेडच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी ३० मे २०१६ रोजी प्रदिप हवाळे याला दोषी ठरवून भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता. त्याने दंडाची रक्कम भरुन सत्र न्यायालयात अपील दाखल केले असता श्रीगोंदा सत्र न्यायालयाने १९ जानेवारी २०२३ रोजी त्याचे अपील खारीज केले होते. २०१६ पासून २०२३ दरम्यान तो जामीनावर होता. सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर १९ जानेवारीला त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

प्रदिपने वरील दोन्ही आदेशांविरुद्ध खंडपीठात फौजदारी पुनर्वीलोकन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्याच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे त्याने दाखल केलेल्या फौजदारी अर्जावर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. प्रदिपच्यावतीने ॲड. कमलाकर सुर्यवंशी यांनी तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र सानप यांनी काम पाहिले.

सुटीच्या दिवशी खंडपीठाने घेतली दुसऱ्यांदा सुनावणीयापुर्वी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आणि न्या. अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने १५ ऑगस्टला सुटीच्या दिवशी विशेष सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशामुळे औरंगाबादचा बॅडमिंटनपटू प्रथमेश कुलकर्णी पुणे येथील ‘इंडिया ज्युनिअर इंटरनॅशनल ग्रँड प्रिक्स २०२२’ आणि नागपूर येथील ‘इंडिया महाराष्ट्र इंटरनॅशनल चॅलेंज २०२२’ या दोन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी