शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वनविभागाच्या असहकारामुळे उन्हाळ्यातील कामे अन् वृक्षारोपणच आले धोक्यात!

By साहेबराव हिवराळे | Updated: March 29, 2024 18:52 IST

दिवस जागतिक वन दिनही आला तसा गेला: कामे सुरू होण्याची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर: वनविभागातील कामे आता रोजगार हमीतून करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असून त्यांनी कामास असहकार सुरू केल्याने उन्हाळ्यात करण्यात येणारी वृक्षारोपणविषयक कामे बंद आहेत. सकारात्मक कामे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.

जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते. जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून खड्डा देखील खोदला नाही की वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास कुणी पुढे आलेले नाही. हंगामी मजुरांची संख्या दिसत नाही. कारण निधीच नाही तर खड्डे खोदणे आणि नर्सरीत रोपांचे संगोपन करणार कोण? अधिकारी झाडांना पाणी देणार काय? मजूरच नाही, नवीन रोपं तयार करण्यात आलेले नाही. यंदाच्या वृक्षारोपणाचा मूळ उद्देशच गोलमाल होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

स्प्रिंकलर्सला कोळ्याचे जाळेनर्सरीत यावेळी रोपांची संख्या खूप चांगल्या अवस्थेत असते, परंतु यंदा छत्रपती संभाजीनगरच्या नर्सरीत अजूनही रोपांचा उन्हाळाच दिसत आहे. उन्हाळ्यातही कमी पाण्यावर रोपं जगावी, यासाठी लावण्यात आलेल्या ठिबक संच आणि स्प्रिंकलर्सला कोळ्याचे जाळे तयार झालेले आहे. यावरून अंदाज येतो की आठ-आठ दिवस मजूरही नर्सरीत पाणी भरण्यासाठी येत नसावे, जेमतेम झाडांची संख्या शहर व परिसराच्या दृष्टीने झाडं उपलब्धच नसल्यास वृक्षारोपणाचा उद्देश कोळ्याच्या जाळ्यात अडकला आहे.

अधिकारी निवडणूक कामात..आचारसंहिता असल्याने अधिकारी निवडणूक कामात गुंतलेले असून, ते या प्रकरणावर बोलण्यास मौन बाळगत असल्याचे वन विभागाचे चित्र आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबादforest departmentवनविभाग