शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:17 IST

Potholes on Aurangabad - Jalana Highway : औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद-जालना महामार्गाची झाली चाळणीपक्क्या दुरूस्तीशिवाय हाल थांबणार नाहीत

- श्रीकांत पोफळे

करमाड (औरंगाबाद ) : मागील २ ते ३ वर्षांपासून औरंगाबाद-जालना महामार्गाची ( Aurangabad - Jalana Highway) पक्या​ स्वरूपात डागडुजी झालेली नाही. त्यात मागच्या वर्षी या परिसरात विक्रमी पाऊस झाला. यामुळे या महामार्गाची पूर्णतः चाळणी झाली होती. दरम्यान, मागील पंधरवाड्यापासून विकासक यंत्रणेकडून सुरू असलेली डागडुजी हा देख्याव्याचा फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, ही दुरूस्ती म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरत आहे.

औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यावर पडलेल्या मोठ-मोठया खड्यामुळे दररोजच लहान-मोठे अपघात घडतात. यातच पडलेल्या खडड्याची डागडुजी होत नसल्याने पाणी साचून हे खड्डे धोकादायक बनत चालल्याने ते तात्काळ बुजवावे, अशा आशयाचे निवेदन औरंगाबाद तालुका भारतीय जनता युवा मोर्चा शाखेच्या वतीने 17 जुलैला टोल व्यवस्थापकांना देण्यात आले. ही बाब आमदार हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade ) यांच्याही कानावर घातली. आ. बागडे यांनी यावेळी कार्यकर्त्यां समोरच संबंधितांचे चांगलेच कानही उपटले होते. पुढील चार दिवसांत सदरील दुरूस्तीचे काम हाती न घेतल्यास टोल नाक्यावर बस्तान मांडुन टोल वसुली बंद करण्यात येऊन आंदोलन करण्याचा इशाराही बागडे नानांनी दिला होता.

यावरून औरंगाबाद-जालना टोलवेज या विकासक कंपनीने आंदोलनाचा धसका घेत सर्वांत जास्त खड्डे पडलेल्या करमाड बसस्थानकाच्या आजुबाजुचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवुन वेळ मारून नेली. त्यानंतर कॅम्ब्रीज ते शेकटा गावापर्यंत पडलेल्या खड्ड्याचे पॅचवर्कचे काम करण्यात आले. आजही काही ठिकाणी हे काम सुरूच आहे. दरम्यान, या कामावेळी फक्त मोठ-मोठे खड्डे व चाळणी झालेल्या भागाचेच पॅचअप करण्यात आले. उर्वरित ठिकाणी मागील चार-पाच दिवसाच्या भिजपावसाने नव्याने खड्डे पडले आहेत तर पॅचअप केलेल्या काही ठिकाणीही पुन्हा थिगळे देण्याची वेळ येणार असल्याने संपूर्ण महामार्गाचे पक्के लेअर देऊन डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांतुन होत आहे.​

तथापि, डागडुजी दरम्यान करमाड बसस्थानका शेजारील तात्पुरत्या स्वरूपातील बुजवलेल्या खड्ड्यांची डागडुजी झालीच नाही. त्यामुळे आता हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या ठिकाणी आजमितीस चार बाय तीन लांबीचे तर दोन-दोन फुट खोलीचे भयावह खड्डे पडलेलेे दिसुन येते. या ठिकाणी दररोजच किरकोळ अपघात व कित्येक वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. इतर ठिकाण सारखी डागडुजी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, माजी सरपंच दत्ता उकर्डे, रविकुमार कुलकर्णी, योगेश कुलकर्णी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डेhighwayमहामार्ग