शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:17 IST

Potholes on Aurangabad - Jalana Highway : औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद-जालना महामार्गाची झाली चाळणीपक्क्या दुरूस्तीशिवाय हाल थांबणार नाहीत

- श्रीकांत पोफळे

करमाड (औरंगाबाद ) : मागील २ ते ३ वर्षांपासून औरंगाबाद-जालना महामार्गाची ( Aurangabad - Jalana Highway) पक्या​ स्वरूपात डागडुजी झालेली नाही. त्यात मागच्या वर्षी या परिसरात विक्रमी पाऊस झाला. यामुळे या महामार्गाची पूर्णतः चाळणी झाली होती. दरम्यान, मागील पंधरवाड्यापासून विकासक यंत्रणेकडून सुरू असलेली डागडुजी हा देख्याव्याचा फार्स ठरत असल्याचे चित्र आहे. कारण, ही दुरूस्ती म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरत आहे.

औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यावर पडलेल्या मोठ-मोठया खड्यामुळे दररोजच लहान-मोठे अपघात घडतात. यातच पडलेल्या खडड्याची डागडुजी होत नसल्याने पाणी साचून हे खड्डे धोकादायक बनत चालल्याने ते तात्काळ बुजवावे, अशा आशयाचे निवेदन औरंगाबाद तालुका भारतीय जनता युवा मोर्चा शाखेच्या वतीने 17 जुलैला टोल व्यवस्थापकांना देण्यात आले. ही बाब आमदार हरिभाऊ बागडे ( Haribhau Bagade ) यांच्याही कानावर घातली. आ. बागडे यांनी यावेळी कार्यकर्त्यां समोरच संबंधितांचे चांगलेच कानही उपटले होते. पुढील चार दिवसांत सदरील दुरूस्तीचे काम हाती न घेतल्यास टोल नाक्यावर बस्तान मांडुन टोल वसुली बंद करण्यात येऊन आंदोलन करण्याचा इशाराही बागडे नानांनी दिला होता.

यावरून औरंगाबाद-जालना टोलवेज या विकासक कंपनीने आंदोलनाचा धसका घेत सर्वांत जास्त खड्डे पडलेल्या करमाड बसस्थानकाच्या आजुबाजुचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवुन वेळ मारून नेली. त्यानंतर कॅम्ब्रीज ते शेकटा गावापर्यंत पडलेल्या खड्ड्याचे पॅचवर्कचे काम करण्यात आले. आजही काही ठिकाणी हे काम सुरूच आहे. दरम्यान, या कामावेळी फक्त मोठ-मोठे खड्डे व चाळणी झालेल्या भागाचेच पॅचअप करण्यात आले. उर्वरित ठिकाणी मागील चार-पाच दिवसाच्या भिजपावसाने नव्याने खड्डे पडले आहेत तर पॅचअप केलेल्या काही ठिकाणीही पुन्हा थिगळे देण्याची वेळ येणार असल्याने संपूर्ण महामार्गाचे पक्के लेअर देऊन डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांतुन होत आहे.​

तथापि, डागडुजी दरम्यान करमाड बसस्थानका शेजारील तात्पुरत्या स्वरूपातील बुजवलेल्या खड्ड्यांची डागडुजी झालीच नाही. त्यामुळे आता हा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या ठिकाणी आजमितीस चार बाय तीन लांबीचे तर दोन-दोन फुट खोलीचे भयावह खड्डे पडलेलेे दिसुन येते. या ठिकाणी दररोजच किरकोळ अपघात व कित्येक वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. इतर ठिकाण सारखी डागडुजी तातडीने करण्यात यावी अशी मागणी करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, माजी सरपंच दत्ता उकर्डे, रविकुमार कुलकर्णी, योगेश कुलकर्णी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPotholeखड्डेhighwayमहामार्ग