शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्याने शहर पाच तास बुडाले अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:11 IST

१३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळली एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबाद : शहरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्याला आणि पावसाला सुरुवात होताच शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री ८.३० वाजेपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे शहर अंधारात बुडाले होते.  

शहरात दुपारी ४.२० वाजता महापारेषण कंपनीच्या हर्सूल ते चिकलठाणा या १३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा, सिडको, नारेगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ७ वाजता ३३ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, अनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने सिडकोतील बहुतांश भागात रात्री ८.३० वाजेपर्यंत अंधार होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे करून एन-५ चा वीजपुरवठा सुरू केला, तर चिकलठाणा परिसरात इंडस्ट्रियल ३ वाहिन्या व इतर ३ वाहिन्या वगळता एन-१, एन-२ सिडको, मुकुंदवाडी, एन-३, एन-४ चा वीजपुरवठा सुरळीत के ला. घरावरील पत्रे झाडे व वाहिन्यांवर कोसळल्याने हर्सूल, शहागंज, सिटीचौक, कटकटगेट परिसरातही वीजपुरवठा खंडित झाला होता.

पाणचक्कीसमोर ३३ केव्ही वाहिनीवर झाड कोसळल्याने पॉवर हाऊस उपकें द्र्र बंद पडले होते. त्यामुळे समर्थनगर, औरंगपुरा, गुलमंडी, निराला बाजार, बसस्थानक रोड, म्हाडा कॉलनीचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने झाड काढून दुरुस्तीचे काम केल्याने सायंकाळी ६ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. नक्षत्रवाडी, सातारा परिसर, गारखेडा भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला. हानी जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची उशिरापर्यंत कसरत सुरू होती. अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री उशिरा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणकडून नागरिकांना दिली जात होती.

साहेब, लाईट केव्हा येणार?क्रांतीचौक, निराला बाजार, एन-८, एन-६, जटवाडा रोड, टीव्ही सेंटरसह विविध भागांत अंधार पसरला होता. शहरातील विविध नागरिक महावितरणच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करून साहेब, लाईट केव्हा येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे आणि खबरदारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे रविवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले. एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण