शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्याने शहर पाच तास बुडाले अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:11 IST

१३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळली एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबाद : शहरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्याला आणि पावसाला सुरुवात होताच शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री ८.३० वाजेपर्यंतही सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे शहर अंधारात बुडाले होते.  

शहरात दुपारी ४.२० वाजता महापारेषण कंपनीच्या हर्सूल ते चिकलठाणा या १३२ केव्ही वाहिनीचे अर्थिंग वायर तुटल्याने महावितरणच्या ३३ केव्हीची ५ उपकेंद्रे बंद झाली. त्यामुळे संपूर्ण चिकलठाणा, सिडको, नारेगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ७ वाजता ३३ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, अनेक ठिकाणी ११ केव्ही वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने सिडकोतील बहुतांश भागात रात्री ८.३० वाजेपर्यंत अंधार होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीची कामे करून एन-५ चा वीजपुरवठा सुरू केला, तर चिकलठाणा परिसरात इंडस्ट्रियल ३ वाहिन्या व इतर ३ वाहिन्या वगळता एन-१, एन-२ सिडको, मुकुंदवाडी, एन-३, एन-४ चा वीजपुरवठा सुरळीत के ला. घरावरील पत्रे झाडे व वाहिन्यांवर कोसळल्याने हर्सूल, शहागंज, सिटीचौक, कटकटगेट परिसरातही वीजपुरवठा खंडित झाला होता.

पाणचक्कीसमोर ३३ केव्ही वाहिनीवर झाड कोसळल्याने पॉवर हाऊस उपकें द्र्र बंद पडले होते. त्यामुळे समर्थनगर, औरंगपुरा, गुलमंडी, निराला बाजार, बसस्थानक रोड, म्हाडा कॉलनीचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने झाड काढून दुरुस्तीचे काम केल्याने सायंकाळी ६ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. नक्षत्रवाडी, सातारा परिसर, गारखेडा भागातही वीजपुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला. हानी जास्त असल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची उशिरापर्यंत कसरत सुरू होती. अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री उशिरा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणकडून नागरिकांना दिली जात होती.

साहेब, लाईट केव्हा येणार?क्रांतीचौक, निराला बाजार, एन-८, एन-६, जटवाडा रोड, टीव्ही सेंटरसह विविध भागांत अंधार पसरला होता. शहरातील विविध नागरिक महावितरणच्या नियंत्रण कक्षाला संपर्क करून साहेब, लाईट केव्हा येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे आणि खबरदारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे रविवारच्या घटनेवरून स्पष्ट झाले. एक प्रकारे महावितरणचा कारभार उघडा पडल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण