शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

मोबाईलसाठी धावत्या रेल्वेच्या दारातून ओढल्याने प्रवाशाचा खाली पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 19:06 IST

रेल्वेरुळावरील खडी आणि दगडांवर तो जोराने आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती

ठळक मुद्देउस्मानपुरा परिसरातील घटना : प्रवाशांचे मोबाईल लुटण्यासाठी मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशांवर घातल्या जातात काठ्या, पोलिसांच्या दुर्लक्षाने तरुणाचा बळी

औरंगाबाद : प्रवाशांचा मोबाईल हिसकावणाऱ्या गँगने धावत्या रेल्वेच्या दारात बसून मोबाईलवर बोलणाऱ्या तरुण प्रवाशाला खाली ओढून पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील रेल्वेरुळावर दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबादेत मित्रासोबत राहत होता.

स्वप्नील शिवाजी राठोड (१९, रा. माळतोंडी, ता. मंठा, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. उस्मानपुरा पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी सांगितले की, माळतोंडी येथील रहिवासी स्वप्नीलच्या मामाचे दोन दिवसानंतर लग्न असल्याने तो आणि त्याच्या दुसऱ्या मामाचा मुलगा हे शुक्रवारी दुपारी तपोवन एक्स्प्रेसने (मुंबई ते नांदेड) परतूरला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन येथून बसला. रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासाला निघाली. तेव्हा स्वप्नील रेल्वेच्या दारात उभा होता. कॉल आल्याने तो मोबाईलवर बोलू लागला. उस्मानपुरा परिसरातील रेल्वेगेट क्रमांक ५३ जवळून कमी वेगात गाडी जात होती. तेव्हा रेल्वेरुळावर उभे राहून रेल्वे प्रवाशांचा मोबाईल हिसकावणाऱ्या गँगमधील काहींनी अचानक स्वप्नीलच्या हातातील मोबाईल हिसकावला. हा मोबाईल हिसकावताना त्या चोरट्यांनी हात पकडून ओढल्याने स्वप्नील रेल्वेतून खाली पडला. रेल्वेरुळावरील खडी आणि दगडांवर तो जोराने आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.

प्रवाशांनी आरडाओरड केल्यामुळे सुमारे सात ते आठ मिनिटे गाडी घटनास्थळी थांबविण्यात आली. रेल्वे गार्डने घटनेची माहिती स्टेशन मास्तरला कळविली. काहींनी घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळविली. सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्वप्नीलसोबतच्या लोकांनी त्यास बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी ४.२५ वाजेच्या सुमारास स्वप्नीलचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद उस्मानपुरा पोलिसांनी घेतली असून, मोबाईल लुटमार करणाऱ्या परिसरातील आरोपींचा शोध सुरू केला.

मामाच्या लग्नासाठी जात होता गावीस्वप्नीलच्या मामाचे दोन दिवसांनंतर लग्न आहे. शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने स्वप्नील मामाच्या मुलासोबत रेल्वेने मंठा तालुक्यातील गावी जात होता. मात्र आजच्या दुर्दैवी घटनेने मामाच्या लग्नाला आणि हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहिली.

चोरटे झाले मोबाईलसह पसारस्वप्नीलला खाली पाडणारे आरोपी स्वप्नीलचा मोबाईल घेऊन घटनास्थळाहून पसार झाले. घटनेपासून स्वप्नीलचा मोबाईल बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

स्वप्नीलला व्हायचे होते अधिकारीस्वप्नीलचे आई-वडील शेतकरी. त्याला एक लहान भाऊ आहे. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलला लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते. मंठा येथील एका महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मित्रासोबत खोली घेऊन औरंगपुरा परिसरात राहत होता. आजच्या घटनेमुळे हे स्वप्न भंगले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन