शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळाच्या गोंधळामुळे ‘आयटीआय’चे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:18 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराचा फटका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.

ठळक मुद्दे दहावीच्या गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार असल्यामुळे आयटीआयचे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे.

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराचा फटका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.  या प्रवेश प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत दिली होती. मात्र, मंडळातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दहावीच्या गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार असल्यामुळे आयटीआयचे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे. संचालनालयाला सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर केला. निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका देण्याची तारीख, वेळ जाहीर करण्याची परंपरा असते. मात्र ही परंपरा दहावीच्या निकालाच्या वेळी यावर्षी खंडित झाली. निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाल्यानंतर राज्य मंडळाने २२ जून रोजी गुणपत्रिका संबंधित शाळांना देण्यात येणार असल्याची माहिती कळवली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील आयटीआय संस्थेतील प्रवेशासाठी १ जूनपासून नोंदणीला सुरुवात केली. ही नोंदणी २० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तर २१ जून रोजी प्रवेशनिश्चिती होणार होती. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी, त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र दहावीच्या गुणपत्रिकाच २२ जूनपर्यंत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे आयटीआयचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. दहावीच्या गुणपत्रिका वाटपाच्या आधारे नवीन वेळापत्रक बनविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयटीआयच्या बहुतांश विषयांना (ट्रेड) प्रवेश हा दहावीच्या विविध विषयांना मिळालेल्या गुणांवरून दिला जातो.सर्व विषयांचे एकत्रित गुण हे मूळ गुणपत्रिकांवरच असतात. यामुळे प्रवेशनिश्चिती गुणपत्रिकाशिवाय शक्य नसल्याची माहिती औरंगाबादच्या शासकीय आयटीआयचे प्राचार्य मिलिंद बनसोडे यांनी दिली.

नोंदणीला थंड प्रतिसादआयटीआयच्या प्रवेशासाठी प्रत्येक वर्षी प्रचंड गर्दी होत असते. गुणवत्ता यादीही ९० टक्क्यांच्या वर जाते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयटीआयच्या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. १ जूनपासून नोंदणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत केवळ १३८ जणांनी आॅनलाईन नोंदणी केली.

औरंगाबाद शासकीय ‘आयटीआय’ची आकडेवारी९८६ - उपलब्ध जागा२७ - विषय (ट्रेड)१३८- आॅनलाईल नोंदणी

टॅग्स :Studentविद्यार्थीSSC Results 2018दहावी निकाल २०१८iti collegeआयटीआय कॉलेजAurangabadऔरंगाबाद