शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

शिक्षण मंडळाच्या गोंधळामुळे ‘आयटीआय’चे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:18 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराचा फटका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.

ठळक मुद्दे दहावीच्या गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार असल्यामुळे आयटीआयचे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे.

औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराचा फटका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.  या प्रवेश प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत दिली होती. मात्र, मंडळातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दहावीच्या गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार असल्यामुळे आयटीआयचे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे. संचालनालयाला सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर केला. निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका देण्याची तारीख, वेळ जाहीर करण्याची परंपरा असते. मात्र ही परंपरा दहावीच्या निकालाच्या वेळी यावर्षी खंडित झाली. निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाल्यानंतर राज्य मंडळाने २२ जून रोजी गुणपत्रिका संबंधित शाळांना देण्यात येणार असल्याची माहिती कळवली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील आयटीआय संस्थेतील प्रवेशासाठी १ जूनपासून नोंदणीला सुरुवात केली. ही नोंदणी २० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तर २१ जून रोजी प्रवेशनिश्चिती होणार होती. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी, त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र दहावीच्या गुणपत्रिकाच २२ जूनपर्यंत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे आयटीआयचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. दहावीच्या गुणपत्रिका वाटपाच्या आधारे नवीन वेळापत्रक बनविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयटीआयच्या बहुतांश विषयांना (ट्रेड) प्रवेश हा दहावीच्या विविध विषयांना मिळालेल्या गुणांवरून दिला जातो.सर्व विषयांचे एकत्रित गुण हे मूळ गुणपत्रिकांवरच असतात. यामुळे प्रवेशनिश्चिती गुणपत्रिकाशिवाय शक्य नसल्याची माहिती औरंगाबादच्या शासकीय आयटीआयचे प्राचार्य मिलिंद बनसोडे यांनी दिली.

नोंदणीला थंड प्रतिसादआयटीआयच्या प्रवेशासाठी प्रत्येक वर्षी प्रचंड गर्दी होत असते. गुणवत्ता यादीही ९० टक्क्यांच्या वर जाते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयटीआयच्या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. १ जूनपासून नोंदणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत केवळ १३८ जणांनी आॅनलाईन नोंदणी केली.

औरंगाबाद शासकीय ‘आयटीआय’ची आकडेवारी९८६ - उपलब्ध जागा२७ - विषय (ट्रेड)१३८- आॅनलाईल नोंदणी

टॅग्स :Studentविद्यार्थीSSC Results 2018दहावी निकाल २०१८iti collegeआयटीआय कॉलेजAurangabadऔरंगाबाद