शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आवक वाढल्याने जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात अर्ध्या टक्क्याने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 19:54 IST

जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली.

ठळक मुद्देअवघ्या तीन तासात आज धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. 

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली, दरम्यान अवघ्या तीन तासात आज धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. 

यंदा जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही धरणात थेंबभर पाण्याची आवक झालेली नव्हती यामुळे धरण प्रशासनासह मराठवाड्यातील जनतेच्या नजरा या पाण्याकडे लागल्या होत्या. दरम्यान आज धरणात मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने मराठवाडाभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हातील धरण समूहातून आज विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मध्यरात्री पासून वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

धरणात आज सायंकाळी १९.३०% जलसाठा झाला होता. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शनिवार पासून पावसाने सततधार कायम ठेवल्याने गोदावरीस पुर आला. सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला होता आज मंगळवारी यात दुपटीने वाढ झाल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे यामुळे जायकवाडीत येणारी आवक  सतत वाढत आहे.

तीन तासात अर्धा टक्का वाढजायकवाडी धरणात आवक सुरू होण्यापूर्वी जलसाठा १८.७९% एवढा होता दरम्यान तीन वाजेस धरणात आवक सुरू झाली व ६ वाजेस जलसाठा १९.३०% एवढा झाला होता. धरणात ११.०७१ दलघमी एवढी वाढ नोंदविली गेली. आजरोजी धरणात एकूण जलसाठा ११५७.२४० दलघमी तर उपयुक्त जलसाठा ४१९.१३४ एवढा झाला आहे असे धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, रमेश चक्रे व श्याम शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊस