शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील रसायन संपल्याने शहरातील बहुतांश वॉर्डांत दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 16:12 IST

: शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली.

ठळक मुद्दे जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आलेज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी गुरुवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आले. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण रसायनांची तातडीने खरेदी करावी, असे आदेशही महापौरांनी दिले. 

दूषित पाण्यामुळे अंंबिकानगर, पदमपुरा भागात काही नागरिकांना साथरोगाची लागण झाली होती. त्यामुळे पालिकेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आज महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सचिन खैरे, किशोर नागरे आदींनी फारोळा गाठले. फारोळ्यातील जलशुद्धीकरणाची माहिती घेताना तेथील भांडारगृहात शुद्धीकरण रसायनांचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच असल्याची बाब समोर आली. तुरटी, ब्लीचिंग आणि क्लोरीनचा साठा संपत आला आहे. ठेकेदाराचे बिल बाकी असल्याने त्याने जलशुद्धीकरण रसायन पुरवठा केलेला नाही. शुक्रवारी रसायन पुरवठा होणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडीमधून येणारे पाणी व शहराकडे जाणारे शुद्ध पाणी या दोन नमुन्यांची तपासणी खासगी संस्थेकडून करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

पाणीपुरवठा अभियंता नॉट रिचेबलपाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांना महापौरांनी वारंवार फोन करण्याचा  प्रयत्न केला; परंतु ते काही उपलब्ध झाले नाहीत. शहरातील दूषित पाण्याची कारणे, फारोळ्यातील रसायनसाठा याची माहिती घेण्यासाठी चहल यांना संपर्क केला; परंतु त्यांचा फोन नॉटरिचेबल होता. 

पाण्याच्या नमुन्यांची तपासणी शहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामागील नेमके कारण पुढे आलेले नाही. फारोळा केंद्रात चांगले पाणी असून शहरातील जलवाहिन्यांमध्ये ते दूषित होते काय, हे पाहण्यासाठी नक्षत्रवाडी ते फारोळा आणि नक्षत्रवाडी ते जलकुंभापर्यंत विविध ठिकाणचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. शहर अभियंता एस.डी. पानझडे, तांत्रिक कक्षप्रमुख एम.बी. काझी, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांची समिती तयार करण्यात आली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने पाण्याचे नमुने घेऊन ते तपासावेत, असे आदेश घोडेले यांनी दिले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई