शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील रसायन संपल्याने शहरातील बहुतांश वॉर्डांत दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 16:12 IST

: शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली.

ठळक मुद्दे जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आलेज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी गुरुवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आले. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण रसायनांची तातडीने खरेदी करावी, असे आदेशही महापौरांनी दिले. 

दूषित पाण्यामुळे अंंबिकानगर, पदमपुरा भागात काही नागरिकांना साथरोगाची लागण झाली होती. त्यामुळे पालिकेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आज महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सचिन खैरे, किशोर नागरे आदींनी फारोळा गाठले. फारोळ्यातील जलशुद्धीकरणाची माहिती घेताना तेथील भांडारगृहात शुद्धीकरण रसायनांचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच असल्याची बाब समोर आली. तुरटी, ब्लीचिंग आणि क्लोरीनचा साठा संपत आला आहे. ठेकेदाराचे बिल बाकी असल्याने त्याने जलशुद्धीकरण रसायन पुरवठा केलेला नाही. शुक्रवारी रसायन पुरवठा होणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडीमधून येणारे पाणी व शहराकडे जाणारे शुद्ध पाणी या दोन नमुन्यांची तपासणी खासगी संस्थेकडून करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

पाणीपुरवठा अभियंता नॉट रिचेबलपाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांना महापौरांनी वारंवार फोन करण्याचा  प्रयत्न केला; परंतु ते काही उपलब्ध झाले नाहीत. शहरातील दूषित पाण्याची कारणे, फारोळ्यातील रसायनसाठा याची माहिती घेण्यासाठी चहल यांना संपर्क केला; परंतु त्यांचा फोन नॉटरिचेबल होता. 

पाण्याच्या नमुन्यांची तपासणी शहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामागील नेमके कारण पुढे आलेले नाही. फारोळा केंद्रात चांगले पाणी असून शहरातील जलवाहिन्यांमध्ये ते दूषित होते काय, हे पाहण्यासाठी नक्षत्रवाडी ते फारोळा आणि नक्षत्रवाडी ते जलकुंभापर्यंत विविध ठिकाणचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. शहर अभियंता एस.डी. पानझडे, तांत्रिक कक्षप्रमुख एम.बी. काझी, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांची समिती तयार करण्यात आली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने पाण्याचे नमुने घेऊन ते तपासावेत, असे आदेश घोडेले यांनी दिले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई