शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील रसायन संपल्याने शहरातील बहुतांश वॉर्डांत दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 16:12 IST

: शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली.

ठळक मुद्दे जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आलेज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी गुरुवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी असून तेथे रसायनसाठा तीन दिवसांपुरताच शिल्लक असल्याचे पाहणीअंती समोर आले. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होतो आहे, तेथील नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यासाठी शहर अभियंत्यांची एक समिती तातडीने गठित करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण रसायनांची तातडीने खरेदी करावी, असे आदेशही महापौरांनी दिले. 

दूषित पाण्यामुळे अंंबिकानगर, पदमपुरा भागात काही नागरिकांना साथरोगाची लागण झाली होती. त्यामुळे पालिकेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आज महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सचिन खैरे, किशोर नागरे आदींनी फारोळा गाठले. फारोळ्यातील जलशुद्धीकरणाची माहिती घेताना तेथील भांडारगृहात शुद्धीकरण रसायनांचा साठा तीन दिवस पुरेल इतकाच असल्याची बाब समोर आली. तुरटी, ब्लीचिंग आणि क्लोरीनचा साठा संपत आला आहे. ठेकेदाराचे बिल बाकी असल्याने त्याने जलशुद्धीकरण रसायन पुरवठा केलेला नाही. शुक्रवारी रसायन पुरवठा होणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडीमधून येणारे पाणी व शहराकडे जाणारे शुद्ध पाणी या दोन नमुन्यांची तपासणी खासगी संस्थेकडून करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

पाणीपुरवठा अभियंता नॉट रिचेबलपाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांना महापौरांनी वारंवार फोन करण्याचा  प्रयत्न केला; परंतु ते काही उपलब्ध झाले नाहीत. शहरातील दूषित पाण्याची कारणे, फारोळ्यातील रसायनसाठा याची माहिती घेण्यासाठी चहल यांना संपर्क केला; परंतु त्यांचा फोन नॉटरिचेबल होता. 

पाण्याच्या नमुन्यांची तपासणी शहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, त्यामागील नेमके कारण पुढे आलेले नाही. फारोळा केंद्रात चांगले पाणी असून शहरातील जलवाहिन्यांमध्ये ते दूषित होते काय, हे पाहण्यासाठी नक्षत्रवाडी ते फारोळा आणि नक्षत्रवाडी ते जलकुंभापर्यंत विविध ठिकाणचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. शहर अभियंता एस.डी. पानझडे, तांत्रिक कक्षप्रमुख एम.बी. काझी, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांची समिती तयार करण्यात आली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने पाण्याचे नमुने घेऊन ते तपासावेत, असे आदेश घोडेले यांनी दिले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई