शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, तर बागायतदारांनी सुरु केली विहिरीच्या पाण्यावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:25 IST

१० जून नंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण केली. त्यानंतर पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले आहेत.

ठळक मुद्देठिबक-तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी देणे सुरू

- श्रीकांत पोफळे..

करमाड ( औरंगाबाद ) : चांगल्या सुरुवातीनंतर पावसाने खंड पाडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतची कामे देखील करता आले नाही. ज्या शेतकऱ्यांनी मशागतीचे काम पूर्ण केले होते त्यांनी पेरणी करून घेतले. ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे ते पावसाची वाट बघून बघून आता विहिरीच्या पाण्यावर पेरणी करण्याचा धाडसी निर्णय घेत आहेत. परंतु, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसलेले कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद तालुक्यात मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी देखील खरिपाची पेरणी वेळेवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मशागतीची कामे पूर्ण झाली अशा सर्व शेतकऱ्यांनी कपाशी, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांच्या लागवडी करण्यास सुरुवात केली. मात्र, मशागतीचे कामे पूर्ण झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे जवळपास पंधरा दिवस कामे लांबली. 

१० जून नंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण केली. त्यानंतर पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले. जवळपास पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. मात्र, आता पावसाची किती दिवस वाट बघायची पुढे चांगला पाऊस झाला तरी खरिपाची लागवड वेळेवर झाली नाही तर उत्पादनात घट होईल या विचाराने ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे त्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पंरतु, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही अशा कोरडवाहू शेतकऱ्यांवर आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघण्याची वेळ आली आहे. 

दुबार पेरणीचे संकट ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्याची गरज पडत आहे. त्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचे स्त्रोत किंवा पाणीच उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार अशी भीती निर्माण झालेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद