शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

कोरडवाहू शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, तर बागायतदारांनी सुरु केली विहिरीच्या पाण्यावर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:25 IST

१० जून नंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण केली. त्यानंतर पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले आहेत.

ठळक मुद्देठिबक-तुषार सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी देणे सुरू

- श्रीकांत पोफळे..

करमाड ( औरंगाबाद ) : चांगल्या सुरुवातीनंतर पावसाने खंड पाडला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतची कामे देखील करता आले नाही. ज्या शेतकऱ्यांनी मशागतीचे काम पूर्ण केले होते त्यांनी पेरणी करून घेतले. ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे ते पावसाची वाट बघून बघून आता विहिरीच्या पाण्यावर पेरणी करण्याचा धाडसी निर्णय घेत आहेत. परंतु, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसलेले कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद तालुक्यात मान्सून पूर्व व रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी देखील खरिपाची पेरणी वेळेवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मशागतीची कामे पूर्ण झाली अशा सर्व शेतकऱ्यांनी कपाशी, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद या खरीप पिकांच्या लागवडी करण्यास सुरुवात केली. मात्र, मशागतीचे कामे पूर्ण झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे जवळपास पंधरा दिवस कामे लांबली. 

१० जून नंतर पाऊस उघडल्यानंतर या शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे पूर्ण केली. त्यानंतर पेरणी करण्यासाठी पावसाची वाट बघू लागले. जवळपास पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. मात्र, आता पावसाची किती दिवस वाट बघायची पुढे चांगला पाऊस झाला तरी खरिपाची लागवड वेळेवर झाली नाही तर उत्पादनात घट होईल या विचाराने ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आहे त्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पंरतु, पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही अशा कोरडवाहू शेतकऱ्यांवर आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघण्याची वेळ आली आहे. 

दुबार पेरणीचे संकट ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्याची गरज पडत आहे. त्यातील सर्वच शेतकऱ्यांकडे पाणी देण्याचे स्त्रोत किंवा पाणीच उपलब्ध नाही असे कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावणार अशी भीती निर्माण झालेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद