शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Drought In Marathwada : दुष्काळाची दाहकता सांगताना पालकमंत्र्यासमोर ढसढसा रडला बळीराजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 17:26 IST

मायबाप सरकारने भरपूर मदत द्यावी, अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने यावेळी केली.

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात दुष्काळ दौऱ्याची पाहणी सुरू असताना गेवराई सेमी येथील शेतकऱ्याने पालकमंत्री दिपक सावंत यांच्या गळ्यात पडून अक्षरश : हंबरडा फोडला. दुष्काळी परिस्थितीत कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याचे कथन या बळीराजाने केले. यावेळी उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. मायबाप सरकारने भरपूर मदत द्यावी, अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने यावेळी केली.

राज्य शासनाने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात सर्वात कमी ३७ टक्के  पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, तालुक्यात केवळ ३४१ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे भीषण दुष्काळाची दाहकता बघून आतापासूनच शेतकऱ्यांच्या जीवाचा थरकाप होऊ लागला आहे. त्यांचे अवसान गळाले आहे. या भयावह दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री दीपक सावंत निल्लोड महसुल मंडळातील गेवराई सेमी येथे आले होते.

पालकमंत्री सावंत यांनी विविध गावांना भेटी देऊन पावसाअभावी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी निल्लोड महसुल मंडळातील गेवराई सेमी येथे आले असता येथील गट क्रंमाक १६८ मधील दुष्काळी शेत शिवार पाहणी करत असताना नागोराव ताठे हे शेतकरी अक्षरश : पालकमंत्र्याच्या गळ्यातपडून  ढसढसा रडले. या शेतकऱ्याने दुष्काळ परिस्थितीमुळे कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. याचा पाढाच वाचला. यामुळे उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले.

पावसाअभावी सर्वच पिके हातातून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. जनावरांसाठी चाराच न राहिल्याने कवडीमोल भावात पशुधन विकावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई म्हणून एकरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी यावेळी या शेतकऱ्याने केली.

विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी येथील कपाशी, मका या पिकांची पाहणी करून पुढील दौऱ्याकडे आपला मोर्चा वळवताना शेतकऱ्यांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे हताश होऊनच सर्व शेतकरी आपापल्या शेतवस्तीकडे परतले. सरकारने पाठविलेल्या पालकमंत्र्यांनी आमचे नुसते आसु पुसले. मात्र, आम्ही केलेल्या त्या मागण्या संदर्भात काहीच उत्तर दिले नाही, याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभुळगाव, वरखेडी, भायगाव, निल्लोड परिसरातील मोठ्या संख्यने शेतकरी एकत्र आले होते. पालकमंत्री आपल्या मागण्यांकडे लक्ष देतील, अशी सर्वांना आश होती. मात्र, गेवराई सेमी येथे शेतकऱ्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल कुठलेही ठोस उत्तर न मिळाल्याने शेतकरी निराश होऊन घरी परतले. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाdeepak sawantदीपक सावंतState Governmentराज्य सरकार