शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : दुष्काळाची दाहकता सांगताना पालकमंत्र्यासमोर ढसढसा रडला बळीराजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 17:26 IST

मायबाप सरकारने भरपूर मदत द्यावी, अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने यावेळी केली.

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात दुष्काळ दौऱ्याची पाहणी सुरू असताना गेवराई सेमी येथील शेतकऱ्याने पालकमंत्री दिपक सावंत यांच्या गळ्यात पडून अक्षरश : हंबरडा फोडला. दुष्काळी परिस्थितीत कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याचे कथन या बळीराजाने केले. यावेळी उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. मायबाप सरकारने भरपूर मदत द्यावी, अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने यावेळी केली.

राज्य शासनाने सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात सर्वात कमी ३७ टक्के  पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, तालुक्यात केवळ ३४१ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे भीषण दुष्काळाची दाहकता बघून आतापासूनच शेतकऱ्यांच्या जीवाचा थरकाप होऊ लागला आहे. त्यांचे अवसान गळाले आहे. या भयावह दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री दीपक सावंत निल्लोड महसुल मंडळातील गेवराई सेमी येथे आले होते.

पालकमंत्री सावंत यांनी विविध गावांना भेटी देऊन पावसाअभावी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी निल्लोड महसुल मंडळातील गेवराई सेमी येथे आले असता येथील गट क्रंमाक १६८ मधील दुष्काळी शेत शिवार पाहणी करत असताना नागोराव ताठे हे शेतकरी अक्षरश : पालकमंत्र्याच्या गळ्यातपडून  ढसढसा रडले. या शेतकऱ्याने दुष्काळ परिस्थितीमुळे कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. याचा पाढाच वाचला. यामुळे उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले.

पावसाअभावी सर्वच पिके हातातून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. जनावरांसाठी चाराच न राहिल्याने कवडीमोल भावात पशुधन विकावे लागत आहे. हाताला काम नसल्याने अर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे मायबाप सरकारने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने भरपाई म्हणून एकरी २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी यावेळी या शेतकऱ्याने केली.

विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी येथील कपाशी, मका या पिकांची पाहणी करून पुढील दौऱ्याकडे आपला मोर्चा वळवताना शेतकऱ्यांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे हताश होऊनच सर्व शेतकरी आपापल्या शेतवस्तीकडे परतले. सरकारने पाठविलेल्या पालकमंत्र्यांनी आमचे नुसते आसु पुसले. मात्र, आम्ही केलेल्या त्या मागण्या संदर्भात काहीच उत्तर दिले नाही, याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभुळगाव, वरखेडी, भायगाव, निल्लोड परिसरातील मोठ्या संख्यने शेतकरी एकत्र आले होते. पालकमंत्री आपल्या मागण्यांकडे लक्ष देतील, अशी सर्वांना आश होती. मात्र, गेवराई सेमी येथे शेतकऱ्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल कुठलेही ठोस उत्तर न मिळाल्याने शेतकरी निराश होऊन घरी परतले. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाdeepak sawantदीपक सावंतState Governmentराज्य सरकार