शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दुष्काळदाह ! शेतकऱ्याने पाण्याअभावी ३०० मोसंबीच्या झाडांवर चालविली करवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 20:09 IST

यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला.

ठळक मुद्देदुष्काळामुळे बळीराजा हतबल बागा जगविणे कठीणविकतही पाणी मिळेना

लासूर स्टेशन ( वैजापूर ) : वर्षाकाठी जवळपास ३ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या मोसंबीच्या बागेला वाचविण्यासाठी यंदा विकतही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकऱ्याने तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ३०० मोसंबीच्या झाडांवर चक्क करवत चालवली. दुष्काळामुळे परिसरात आताच पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक पडल्याने आगामी काळात भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे. 

लासूर स्टेशनसह परिसरातील गावांना दुष्काळ जणू पाचविलाच पुजला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे परिसरात एका प्रकारे दुष्काळवाडाच झाला आहे. सध्या हिवाळा सुरू असला तरी आता पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनावरांच्या पाण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यात पीकही जगविणे अवघड झाल्याने हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकरी अनिल क-हाळे या तरुण शेतकऱ्यावर दीड एकर क्षेत्रावरील जवळपास ३०० मोसंबीची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला दोन ते तीन वर्षेमोसंबी विक्रीतून या शेतकऱ्याला वर्षाकाठी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न झाले होते; मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे हळूहळू त्यांना उत्पादनात फटका बसू लागला; मात्र यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला. यानंतर कशीबशी विकतच्या पाण्यावर बाग जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरात शेतीसाठी विकतही पाणी मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या या शेतकऱ्याने ३०० मोसंबीच्या झाडांवर करवत चालविली.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी