शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुष्काळदाह ! शेतकऱ्याने पाण्याअभावी ३०० मोसंबीच्या झाडांवर चालविली करवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 20:09 IST

यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला.

ठळक मुद्देदुष्काळामुळे बळीराजा हतबल बागा जगविणे कठीणविकतही पाणी मिळेना

लासूर स्टेशन ( वैजापूर ) : वर्षाकाठी जवळपास ३ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या मोसंबीच्या बागेला वाचविण्यासाठी यंदा विकतही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकऱ्याने तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ३०० मोसंबीच्या झाडांवर चक्क करवत चालवली. दुष्काळामुळे परिसरात आताच पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक पडल्याने आगामी काळात भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे. 

लासूर स्टेशनसह परिसरातील गावांना दुष्काळ जणू पाचविलाच पुजला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे परिसरात एका प्रकारे दुष्काळवाडाच झाला आहे. सध्या हिवाळा सुरू असला तरी आता पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनावरांच्या पाण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यात पीकही जगविणे अवघड झाल्याने हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकरी अनिल क-हाळे या तरुण शेतकऱ्यावर दीड एकर क्षेत्रावरील जवळपास ३०० मोसंबीची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला दोन ते तीन वर्षेमोसंबी विक्रीतून या शेतकऱ्याला वर्षाकाठी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न झाले होते; मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे हळूहळू त्यांना उत्पादनात फटका बसू लागला; मात्र यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला. यानंतर कशीबशी विकतच्या पाण्यावर बाग जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरात शेतीसाठी विकतही पाणी मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या या शेतकऱ्याने ३०० मोसंबीच्या झाडांवर करवत चालविली.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी