शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दुष्काळदाह ! शेतकऱ्याने पाण्याअभावी ३०० मोसंबीच्या झाडांवर चालविली करवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 20:09 IST

यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला.

ठळक मुद्देदुष्काळामुळे बळीराजा हतबल बागा जगविणे कठीणविकतही पाणी मिळेना

लासूर स्टेशन ( वैजापूर ) : वर्षाकाठी जवळपास ३ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या मोसंबीच्या बागेला वाचविण्यासाठी यंदा विकतही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकऱ्याने तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ३०० मोसंबीच्या झाडांवर चक्क करवत चालवली. दुष्काळामुळे परिसरात आताच पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक पडल्याने आगामी काळात भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे. 

लासूर स्टेशनसह परिसरातील गावांना दुष्काळ जणू पाचविलाच पुजला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे परिसरात एका प्रकारे दुष्काळवाडाच झाला आहे. सध्या हिवाळा सुरू असला तरी आता पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनावरांच्या पाण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यात पीकही जगविणे अवघड झाल्याने हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकरी अनिल क-हाळे या तरुण शेतकऱ्यावर दीड एकर क्षेत्रावरील जवळपास ३०० मोसंबीची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला दोन ते तीन वर्षेमोसंबी विक्रीतून या शेतकऱ्याला वर्षाकाठी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न झाले होते; मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे हळूहळू त्यांना उत्पादनात फटका बसू लागला; मात्र यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला. यानंतर कशीबशी विकतच्या पाण्यावर बाग जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरात शेतीसाठी विकतही पाणी मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या या शेतकऱ्याने ३०० मोसंबीच्या झाडांवर करवत चालविली.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी