शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू

By संतोष हिरेमठ | Updated: January 19, 2024 15:40 IST

मराठवाड्यातील रस्त्यांवर रोज ७ जणांचा बळी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात रस्ते अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे. राज्यात अवघ्या ११ महिन्यांत ३० हजारांवर अपघात झाले असून, त्यात १३ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला. मराठवाड्यातील रस्त्यांवरही दररोज जवळपास ७ लोकांचा रस्ते अपघातात बळी जात आहे. अपघात आणि मृत्यूची संख्या पाहता वाहन चालविताना काळजी घेण्याची गरज आहे. तर शासनानेही अपघात प्रणवस्थळांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांतील अपघातांची तुलना करणारी २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षांची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहता २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. राज्यात २०२१ मध्ये २६ हजार ५३५ अपघात, १२ हजार १७० मृत्यू झाले. तर २०२३ मध्ये ३० हजार ८५७ अपघात आणि १३ हजार ५७९ मृत्यू झाले.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील अपघातवर्ष- अपघात- एकूण मृत्यू२०२१-५४०-३६५२०२२-६७५-४२८२०२३-७२५-४३५

छत्रपती संभाजीनगर शहरातील अपघातवर्ष- अपघात- एकूण मृत्यू२०२१- ४२७-१४३२०२२- ४७१-१८६२०२३- ५६८-१८७

मराठवाड्यात २०२३ मध्ये किती अपघात ?जिल्हा- अपघात- एकूण मृत्यूपरभणी-३९६-१९८लातूर- ७३१-३३९हिंगोली-३३७-१९०नांदेड-६३३-३४०बीड-७४०-४१५धाराशिव- ५९७-२६८जालना-५२८-३०५

राज्यातील स्थिती (२०२३)ठिकाण- अपघात- एकूण मृत्यूपुणे ग्रामीण-१७००-९६३मुंबई शहर - १२६३-२५२नवी मुंबई - ६९५-२१७नागपूर ग्रामीण -८४५-३६७नागपूर शहर-११०३-२७७पुणे शहर-११३२-३१६पिंपरी चिंचवड-१०९७-३३४नंदूरबार-२९१-१८४सातारा-८८४-४५१नाशिक शहर-४२६-१७१सोलापूर ग्रामीण-१११३-६११सोलापूर शहर- १७४-६९कोल्हापूर-१०६६-३७६नाशिक शहर-४२६-१७१जळगाव-८१७-४३२

अपघाताची काही कारणे- खराब रस्ता, धोकादायक वळण.- गुळगुळीत रस्त्यांवर वाहनांचा अतिवेग.- मद्यपान करून वाहन चालविणे.- वाहन चालविताना डुलकी लागणे.- नादुरुस्त वाहन चालविणे.- अनेक ठिकाणी तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लावणे कठीण.- दुचाकीचालकांची राष्ट्रीय महामार्गांवर वाढती संख्या.

हेल्मेट, सीटबेल्ट वापराछत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात काही प्रमाणात अपघात वाढले आहे. हे अपघात कमी करण्यासाठी विविध प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. वाहनचालकांनी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद