शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण! पदस्थापना मिळताच अनेकांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू 

By राम शिनगारे | Updated: March 14, 2024 14:51 IST

शिक्षक भरती : ३६३ पैकी २२७ जणांची मिळाली गावे, उर्वरित शिक्षकांना १६ मार्चला मिळणार

छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून शिक्षक होण्याचे पाहिलेले अनेकांचे स्वप्न बुधवारी पूर्ण झाले. जि. प. सभागृहात निवड झालेल्या ३६३ पैकी २२७ जणांना प्रत्यक्ष पदस्थापना देण्यात आली. उर्वरित उमेदवारांना १६ मार्चला पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पदस्थापना घेऊन सभागृहाबाहेर आल्यानंतर अनेक उमेदवारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचेही पाहायला मिळाले.

तब्बल दहा वर्षांनंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६३ उमेदवारांना पदस्थापना देण्यासाठी बुधवारी कागदपत्रांसह बोलावण्यात आले होते. जि.प.च्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यात मराठी माध्यम पदवीधर प्राथमिक शिक्षकातील १९७, उर्दू माध्यम पदवीधर प्राथमिक शिक्षक १६ आणि उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक १४ अशा २२७ जणांना पहिल्याच दिवशी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापना देण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. पहिली ते पाचवीच्या उमेदवारांना १६ मार्चला येण्यास सांगितले. त्यामुळे उन्हात बसलेल्या उमेदवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. आम्ही इतक्या लांबून आलो. आजच प्रक्रिया का नाही, असा सवाल उपस्थित उमेदवारांनी केला. मोठ्या आशेने आलो, पण हिरमोड झाल्याचे नव्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसून आले. दरम्यान, नव्याने नियुक्ती होत असतानाही ‘सर आम्हाला जवळचे गाव द्या, छत्रपती संभाजीनगरच द्या’ अशी मागणी उमेदवार करीत होते. पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, अधीक्षक सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी लईक सोपी, संगीता सावळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप राठोड, रवींद्र देवडे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत दीक्षित, रवींद्र संगवी, कृष्णा शिंदे, आदींचा समावेश होता.

जेवणासह सेल्फीची उत्तम सोयनिवड झालेले उमेदवार राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून नातेवाइकांसह आले होते. त्यासोबत महिलासोबत लहान मुलेही होती. त्यामुळे जि. प. प्रशासनाने परिसरात मंडपासह जेवणाचीही उत्तम सोय केली होती. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉईंटही बनविण्यात आला होता.

संघटनांचा बदल्यांसाठी दबावजिल्हा परिषदेच्या प्रशासनावर नव्या शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याचा प्रचंड दबाव होता. आंतरजिल्हा बदली, विनंती बदलीची मागणी असलेल्यांचा अगोदर विचार करावा, अशी मागणीच विविध संघटनांनी केली. त्यामुळे जि. प. प्रशासनाने ३६३ पैकी केवळ २२७ जणांनाच पदस्थापना दिली. उर्वरित शिक्षकांना १६ मार्चला देण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वीच कार्यरत शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहे. त्यासाठी शिक्षक संघटनांची बैठकही बुधवारी सायंकाळी शिक्षण विभागाने घेतली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducationशिक्षण