शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नालेसफाई घेणार महापालिकेची परीक्षा; आचारसंहितेनंतर निघणार साफसफाईची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 20:06 IST

जून महिन्यात कामाला सुरुवात होईल. 

ठळक मुद्दे२३ मे रोजी आचारसंहिता संपल्यावर निविदा काढण्यात येईल.

औरंगाबाद :  मान्सूनपूर्वी दरवर्षी शहरातील नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर येतो. मागील वर्षी मनपाने कमी आणि पावसाने नालेसफाई जादा केली होती. यंदा अर्धा मे महिना संपत आला तरी महापालिकेने नालेसफाईसाठी निविदाही काढली नाही. २३ मे रोजी आचारसंहिता संपल्यावर निविदा काढण्यात येईल. त्यानंतर जून महिन्यात कामाला सुरुवात होईल. 

महापालिकेतील काही मंडळींसाठी नालेसफाई अत्यंत आवडीचा विषय बनला आहे. दरवर्षी नालेसफाईचे काम एकाच व्यक्तीला देण्यात येते. नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली होती. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला होता. यंदाही शहरातील ९ झोनसाठी तब्बल दोन कोटींच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते हे सर्वश्रुत आहे. मार्च, एप्रिलपासूनच तयारी करायला हवी. यंदा आचारसंहितेचे निमित्त सांगून तयारीला सुरुवात करण्यात आली नाही. दरवर्षी ज्या पद्धतीने नालेसफाई करायला हवी, त्या पद्धतीने होत नाही. नाल्याच्या दर्शनी भागातील फक्त केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो. दरवर्षी फक्त नालेसफाईचा देखावा करण्यात येतो. पावसाळा संपताच कोट्यवधींची बिले उचलण्यात येतात. 

पावसाळ्यात निर्माण होणारे ‘डेंजर झोन’दरवर्षी पावसाळ्यात गारखेडा परिसरातील शंभूनगर येथील नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरते. गजानन महाराज मंदिर रोडवरील दिशा संकुल, गुरूकृपा हाऊसिंग सोसायटी, जयभवानीनगर, विष्णूनगर, छत्रपतीनगर, भानुदासनगर आदी कॉलन्यांमध्ये मोठ्या पावसामुळे हाहाकार उडतो.  टाऊन हॉल, किराडपुरा, कटकटगेट, पोलीस कॉलनीजवळील वसाहती, जुनाबाजारमधील नाल्याशेजारील वसाहती, अशा अनेक भागांतील नागरिकांना पावसाच्या पाण्याचा फटका बसू शकतो.

कचऱ्याने नाले तुडुंबशहरात मोठा पाऊस झाल्यास उथळ नाल्यामुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची अवस्था ‘मुंबई’ प्रमाणे होते. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे. 

इमारती, अतिक्रमणेशहरातील विविध नाल्यांवर खाजगी संस्था, बँकांनी १५ ठिकाणी इमारती उभारल्या आहेत. याशिवाय अतिक्रमणेही शेकडोच्या संख्येने आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची हिंमत प्रशासनाने कधीच दाखविली नाही. कारण यामागेही अनेकदा ‘राजकारण’आडवे येते. इमारत मालकांनीच त्यांच्या नाल्याखालील गाळ काढावा, अशी अट फक्त कागदावरच आहे. मात्र मागील काही वर्षात एकाही इमारत मालकाने नाला साफ केला नाही. त्यामुळे काही इमारतीखालून पाणी वाहणेच बंद झाले आहे. पावसाळ्यात दलालवाडी व पैठणगेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. 

नाल्यांवरील जागांचा तपशीलसंस्था, संघटना    जागामराठा समाज सेवा मंडळ    ३७२ चौरस मीटर औषधी भवन    ६८४ चौरस मीटर सुराणा कॉम्प्लेक्स    ३८०० चौरस मीटर शिवाई ट्रस्ट     १२२० चौरस मीटर बॉम्बे मर्कंटाईल बँक    ९०० चौरस मीटर        पीपल्स बँक, दलालवाडी    ८२२ चौरस मीटर सारस्वत बँक, नागेश्वरवाडी    १०५३.९० चौरस मीटर प्रेम सुराणा, पैठणगेट    ३ हजार चौरस मीटरमिर्झा मुस्तफा बेग, जाफरगेट    २७९ चौरस मीटर 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नRainपाऊसWaterपाणी