शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नऊ जणांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:34 IST

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.पुरस्कारासाठी प्रतिव्यक्ती १५ हजार आणि प्रतिसंस्था २५ हजार रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद येथील डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील यादव सीताराम तामगाडगे, लातूर येथील केशव गोरोबा कांबळे, धडकनाळ येथील पंडित केरबा सूर्यवंशी, जळकोट येथील माजीद गफूरसाब मोमीन, परभणी येथील भीमराव नागराव हत्तीअंबिरे, हिंगोली येथील साहेबराव कामाजीराव कांबळे, औंढा येथील सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि बीड येथील शंकर चन्नापा वीटकर यांचा समावेश आहे. सामाजिक काम करणाºया व्यक्ती, संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून १९७१-७२ पासून हा पुरस्कार दिला जातो.

दु:खितांचा कैवार घेताना जे राबता आलं, त्याची दखल राजसत्तेनं घेतली, त्याचं एक विलक्षण समाधान आहे. मी भानावर राहून दीन-दुबळे, ओबीसी, एससी,एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी याशिवाय सवर्णांमधील दुबळ्यांसाठीसुद्धा झटत राहावे, अशी प्रेरणा हा पुरस्कार देईल.-प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, औरंगाबाद
तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रयत्न केले़ याची शासनाने दखल घेतली, याचा आनंद आहे़-माजीद गफूरसाब मोमीन जळकोट, जि़ लातूर

गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या समाजसेवेचे फळ मिळाले, याचा आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटत आहे.- साहेबराव कांबळे , हिंगोली
हा सन्मान माझा एकट्याचा नसून, भटक्या विमुक्त चळवळीत काम करणाºया माझ्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे.- शंकर वीटकर, बीड
या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्मी मिळाली असून, यापुढेही समाजाच्या शेवटच्या घटकाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहणार आहे़-भीमराव हत्तीअंबिरे, परभणी
गेली ३५ वर्षे आंबेडकरी चळवळीत आणि धम्म कार्यात आहे़ शासनाकडून त्याची दखल घेतली गेली याचा मनस्वी आनंद आहे़ हा आंबेडकरी चळवळीचा बहुमान आहे़-केशव गोरोबा कांबळे, लातूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे समाजकार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.-पंडित केरबा सूर्यवंशी, धडकनाळ, जि. लातूर
शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठीही प्रयत्न केले. या बरोबरच विविध नाटकांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे काम केले. शासनाने याची दखल घेतल्याचा आनंद आहे.- यादवराव तामगाडगे, किनवट, जि. नांदेड
गेल्या ३0 वर्षांपासून आंबेडकरी विचारधारेसोबतच समाजसेवेचे काम करीत आहे. त्याच विचारधारेमुळे आज मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळाला.-सूरजितसिंह ठाकूर, औंढा, जि. हिंगोली

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा