शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार नऊ जणांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:34 IST

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत.पुरस्कारासाठी प्रतिव्यक्ती १५ हजार आणि प्रतिसंस्था २५ हजार रुपये अशी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद येथील डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे, नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील यादव सीताराम तामगाडगे, लातूर येथील केशव गोरोबा कांबळे, धडकनाळ येथील पंडित केरबा सूर्यवंशी, जळकोट येथील माजीद गफूरसाब मोमीन, परभणी येथील भीमराव नागराव हत्तीअंबिरे, हिंगोली येथील साहेबराव कामाजीराव कांबळे, औंढा येथील सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर) आणि बीड येथील शंकर चन्नापा वीटकर यांचा समावेश आहे. सामाजिक काम करणाºया व्यक्ती, संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून १९७१-७२ पासून हा पुरस्कार दिला जातो.

दु:खितांचा कैवार घेताना जे राबता आलं, त्याची दखल राजसत्तेनं घेतली, त्याचं एक विलक्षण समाधान आहे. मी भानावर राहून दीन-दुबळे, ओबीसी, एससी,एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी याशिवाय सवर्णांमधील दुबळ्यांसाठीसुद्धा झटत राहावे, अशी प्रेरणा हा पुरस्कार देईल.-प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, औरंगाबाद
तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रयत्न केले़ याची शासनाने दखल घेतली, याचा आनंद आहे़-माजीद गफूरसाब मोमीन जळकोट, जि़ लातूर

गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या समाजसेवेचे फळ मिळाले, याचा आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटत आहे.- साहेबराव कांबळे , हिंगोली
हा सन्मान माझा एकट्याचा नसून, भटक्या विमुक्त चळवळीत काम करणाºया माझ्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे.- शंकर वीटकर, बीड
या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्मी मिळाली असून, यापुढेही समाजाच्या शेवटच्या घटकाच्या उत्कर्षासाठी सतत कार्यरत राहणार आहे़-भीमराव हत्तीअंबिरे, परभणी
गेली ३५ वर्षे आंबेडकरी चळवळीत आणि धम्म कार्यात आहे़ शासनाकडून त्याची दखल घेतली गेली याचा मनस्वी आनंद आहे़ हा आंबेडकरी चळवळीचा बहुमान आहे़-केशव गोरोबा कांबळे, लातूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे समाजकार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.-पंडित केरबा सूर्यवंशी, धडकनाळ, जि. लातूर
शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठीही प्रयत्न केले. या बरोबरच विविध नाटकांच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचे काम केले. शासनाने याची दखल घेतल्याचा आनंद आहे.- यादवराव तामगाडगे, किनवट, जि. नांदेड
गेल्या ३0 वर्षांपासून आंबेडकरी विचारधारेसोबतच समाजसेवेचे काम करीत आहे. त्याच विचारधारेमुळे आज मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार मिळाला.-सूरजितसिंह ठाकूर, औंढा, जि. हिंगोली

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा