शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण; जालना - खामगाव रेल्वेमार्गाला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:20 IST

रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव पाठविला नीती आयोगाकडे

औरंगाबाद :औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि जालना - खामगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने ‘ग्रीन सिग्नल’ दाखविला आहे. हे दोन्ही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मूल्यांकनासाठी नीती आयोगाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचे समर्थन केले आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी - मनमाड या २९१ कि.मी. अंतर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे. मात्र, त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. जुलैअखेर हे सर्वेक्षणही पूर्ण झाले.

जालना - खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेची १०६ वर्षांची मागणी अखेर मंजूर झाली. नवीन ‘मॉडिफाइड इकॉनॉमिक इंटरनल रेट ऑफ रिटर्न’ मॉडेलच्या आधारे प्रकल्पासाठी गुंतवणुकीचे समर्थन करत रेल्वे मंत्रालयाने हे दोन्ही प्रकल्प प्रस्तावांचा संच नीती आयोगाकडे मूल्यांकनासाठी पाठवला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेले प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दुहेरीकरण का गरजेचे?औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. शिवाय रेल्वेचा वेग वाढेल. एकेरी मार्गावर एखाद्या रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे कायमचा थांबेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे