शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण; जालना - खामगाव रेल्वेमार्गाला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 12:20 IST

रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव पाठविला नीती आयोगाकडे

औरंगाबाद :औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि जालना - खामगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने ‘ग्रीन सिग्नल’ दाखविला आहे. हे दोन्ही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मूल्यांकनासाठी नीती आयोगाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचे समर्थन केले आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी - मनमाड या २९१ कि.मी. अंतर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे. मात्र, त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. जुलैअखेर हे सर्वेक्षणही पूर्ण झाले.

जालना - खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेची १०६ वर्षांची मागणी अखेर मंजूर झाली. नवीन ‘मॉडिफाइड इकॉनॉमिक इंटरनल रेट ऑफ रिटर्न’ मॉडेलच्या आधारे प्रकल्पासाठी गुंतवणुकीचे समर्थन करत रेल्वे मंत्रालयाने हे दोन्ही प्रकल्प प्रस्तावांचा संच नीती आयोगाकडे मूल्यांकनासाठी पाठवला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेले प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दुहेरीकरण का गरजेचे?औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. शिवाय रेल्वेचा वेग वाढेल. एकेरी मार्गावर एखाद्या रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे कायमचा थांबेल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे