शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

औरंगाबादकरांवर दुहेरी संकट; कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:33 IST

कोरोनाच्या विळख्यात 'सारी'ने बळी जाण्याचे प्रमाण अधिक

ठळक मुद्देकोरोनासोबत सारीचे थैमान१० दिवसात सारीचे ११ बळी

औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात सारी'चे (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) संकट वाढत आहे. कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण आढळून येत आहे. शहरात कोरोनापेक्षा सध्यातरी सारीने बळी जाणाऱ्यांची संख्या अधीक असल्याने वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. 

शहरात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. आतापर्यंत एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकच चिंता व्यक्त होत आहे. मात्र, सध्या कोरोना एवढ्याच 'सारी' जिल्ह्यासाठी संकट ठरत आहे. शहरात २४ मार्च रोजी कोरोनासदृश्य सारीने एकाचा मृत्यू झाल्याचे समोरे आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. परंतु त्यांनतरही सारीच्या रुग्णांचा बळी जाणे सुरूच आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रनेचे सारीकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी केली जात आहे. ही चाचणी निगेटिव्ह येताच सुटकेचा निःस्वास सोडला जात आहे. 

मात्र, निगेटिव्ह अहवाल आलेले सारीचे रुग्णही मृत्युमुखी पडत आहे. याकडे आरोग्य विभागाने गंभीरतेने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले. मात्र, एका कोरोनाच्या मागे पाच सारीचे रुग्ण आढळत असल्याने काळजी व्यक्त होत आहे. सारीच्या रुग्णांच्या संख्याने आजघडीला शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू या आजाराने २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. यात १० जनांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह होता. तर एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ही संख्या आता १२ वर गेल्याचे गुरुवारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. या कारणाने होतो सारी एकदम सर्दी, तापाचे प्रमाण जास्त , खूप अशक्तपणा , निमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी सारीचे लक्षणे आहेत. हा श्वसन मार्गाचा गंभीर आजार आहे. यात फुफ्फुसात पाणी (एआरडीएस), काही भागाला सूज येते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीमुळे याला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांना आहे सर्वाधिक धोका सरीचा लहान मुले आणि जेष्ठ नागरिक , प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, मधुमेह, ह्रदयरोग आलेल्या रुग्णांना सारीचा सर्वाधिक धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

प्रमाण वाढले सारीचे प्रमाण सध्या वाढले आहे. श्वसन संस्थेचा गंभीर आजार म्हणून सारीकडे पाहिले जाते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीमुळे सारी होऊ शकतो. फुफ्फुसात पाणी होते. काही भागावर सूज येते. दमन लागत असल्याने रुग्णाला बोलताही येत नाही. त्यामुळे ऑक्सिजन द्यावे लागते.- डॉ. गजानन सुरवाडे, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, घाटी

गंभीरतेने घ्यावे लागेल कोरोनासारखी लक्षणे मात्र, तपासणी अहवाल निगेटिव्ह येणारा रुग्ण हा सरीचा म्हटला जातो. सध्या एका करोनाच्या रुग्णामागे सारीचे पाच रुग्ण आढळत आहे. सारीचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. याला गंभीरतेने घेतले पाहिजे.- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, औरंगाबाद 

फिजिशियन असोसिएशन वेळीच लक्ष द्यावे आयसीयूमध्ये कोरोना संशयित रुग्ण असतो. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर सारीचा रुग्ण म्हणून उपचार केला जातो. दम लागणे, ताप येणे, थकवा येणे, जुलाब आशा गोष्टीकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. - डॉ. आनंद निकाळजे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद